Prabuddh Bharat

Prabuddh Bharat The official Facebook handle of the voice of social justice, equity and equality .
(334)

मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण ज...
08/06/2026

मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

कर्जत : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाची घरगणना आणि जनगणना प्रभावीपणे व्हावी, तसेच त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुशाफिरी यात्रा’ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव, पाटेवाडी, हंडाळवाडी, कर्जत शहर, भांडेवाडी, राशीन, बाभुळगाव दुमाला, पिंपळवाडी आणि कुळधरण येथे भेटी देण्यात आल्या.

भटके-विमुक्त समाजाचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान समाजबांधवांच्या पालांवर, तांड्यांवर आणि तात्पुरत्या निवासस्थानी जाऊन संवाद साधण्यात आला. यावेळी अनेक कुटुंबांनी अद्यापही त्यांची घरगणना अथवा जनगणना झालेली नसल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 78 वर्षे उलटूनही भटके-विमुक्त समाजाला जगण्यासाठी हक्काचे घर तर दूरच, परंतु मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही जागा उपलब्ध नाही. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित राहत असून त्यांच्या अचूक नोंदी नसल्याने भविष्यात नागरिकत्व सिद्ध करण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या समाजाची घरगणना व जनगणना तातडीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने होणे आवश्यक आहे.

ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिवा उमाताई जाधव यांनी महिलांशी संवाद साधताना भटकंतीमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या आरोग्य सुविधांसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजाची योग्य नोंदणी न झाल्यास भविष्यात नागरिकत्वाशी संबंधित विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शासनाने या समाजाच्या सर्वंकष सर्वेक्षणाला प्राधान्य द्यावे.

बाभुळगावचे सरपंच अमोल चव्हाण यांनी गावातील भटके-विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच घरकुल, शिक्षण, आरोग्य आणि इतर शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान डवरी गोसावी, वडार, भिल्ल, पारधी, कैकाडी, तिरमली, मरीआईवाले आदी विविध भटके-विमुक्त समाजाचे शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी तुकाराम पवार, शितलताई पवार, ललिताताई पवार, राहुल पवार, रेश्माताई बागवान, ऋषी गायकवाड, चंपाताई पवार, काजुरी पवार, उत्तम सावंत आणि नवनाथ शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार तुकाराम शिंदे यांनी मानले. यावेळी दिसेना पवार, रंगीशा काळे, पार्वतीताई भोसले, वैभव काळे, सावकार भोसले, आतिश पवार, बापू काळे, सुनील काळे, दिनेश काळे आणि अविनाश काळे आदी उपस्थित होते.











📍 ८ जून - दिनविशेष ८ जून १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना औपचारिकरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना Columbia Univer...
08/06/2026

📍 ८ जून - दिनविशेष

८ जून १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना औपचारिकरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना Columbia University कडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांचा प्रबंध "The Evolution of Provincial Finance in British India" या विषयावर होता. हा प्रबंध बडोद्याचे अधिपती सयाजीराव गायकवाड यांना समर्पित करण्यात आला होता. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी त्यांनीच बाबासाहेबांना उपलब्ध करून दिली होती.

या संशोधनप्रबंधात ब्रिटिश भारतातील आर्थिक प्रशासन आणि नोकरशाहीची सखोल चिकित्सा करण्यात आली असून, ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक धोरणांतील विसंगती आणि शोषणकारी स्वरूपावर कठोर प्रकाश टाकण्यात आला आहे.





नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीना...
08/06/2026

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने हिंगोली जिह्यात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले.

या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





नीट पेपरफुटीचा निषेध; सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे कल्याणमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्...
08/06/2026

नीट पेपरफुटीचा निषेध; सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे कल्याणमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने कल्याण शहरात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले.

या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख रोहित डोळस, कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष कमलेश उबाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







📍 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 08 जून 2026🔴NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित ...
08/06/2026

📍 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 08 जून 2026

🔴NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन

🔴विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा

🔴मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत

🔴धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला.

🔴ओडिशा दक्षता विभागाची मोठी कारवाई; नऊ ठिकाणांवर एकाच वेळी छापे

🔴बीड मधील शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारच्या निर्णयाची होळी

🔴नांदेडमध्ये पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा

🔴'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप

🔴मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन

🔴एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलनऔरंगा...
07/06/2026

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोस्टर आंदोलन

औरंगाबाद : NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली आहे. यासाठी शहरात पोस्टर लावून त्यांनी निषेध व्यक्त केला.

जाधव यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये NEET परीक्षेला बसलेल्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वारंवार समोर येणाऱ्या परीक्षा अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पोस्टरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. NEET परीक्षेत वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणखी किती विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर उद्ध्वस्त होणार, आणखी किती विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जाणार आणि आपल्या मुलांना गमावण्याचे दुःख आणखी किती पालकांना सहन करावे लागणार, असे सवाल करण्यात आले आहेत.

शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली आहे.





विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड, महाविकास आघाडीचा भाजपला पाठिंबा? संपूर्ण राजकीय गणित समजून घ्या
07/06/2026

विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड, महाविकास आघाडीचा भाजपला पाठिंबा? संपूर्ण राजकीय गणित समजून घ्या






Prabuddh Bharat Live | Vanchit Bahujan aghadi news | Babasaheb Ambe...

📍 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 07 जून 2026🔴 बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्...
07/06/2026

📍 प्रबुद्ध भारत बुलेटिन, 07 जून 2026

🔴 बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी

🔴 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

🔴 मनमाडमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

🔴 तेल कंपन्यांना मोठा फटका, दररोज 600 कोटी रुपयांचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

🔴 नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद

🔴 ठाण्यातील विभागीय अधिकाऱ्यास कराडमध्ये कारने उडवले, जागीच मृत्यू; अपघात की घातपात? सखोल चौकशीची मागणी

🔴 धक्कादायक! चंद्रपुरात चक्क कॅन्सर हॉस्पिटलवरच सायबर हल्ला, डेटा लॉक; हॅकर्सकडून 75 लाखांची मागणी

🔴 केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात

नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपदNorwayChess 2026 : भारताचा युवा ग्रँ...
06/06/2026

नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंदचा ऐतिहासिक डंका; भारताला मिळवून दिले पहिले विजेतेपद

NorwayChess 2026 : भारताचा युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.

अवघ्या 20 वर्षांच्या प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीपूर्वी तो 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, विजेतेपदासाठी निर्णायक ठरलेल्या अखेरच्या सामन्यात त्याने जर्मनीच्या विन्सेंट केमरवर मात करत 3 महत्त्वाचे गुण मिळवले. या विजयामुळे त्याचे एकूण गुण 18 झाले आणि त्याने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे, स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात प्रज्ञानंदने सलग चार सामने जिंकत जबरदस्त पुनरागमन केले. दबावाच्या परिस्थितीतही त्याने दाखवलेली शांतता, अचूक डावपेच आणि रणनीती यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या स्पर्धेतील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे प्रज्ञानंदने जगातील अव्वल बुद्धिबळपटू आणि पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला दोन वेळा पराभूत केले. एका स्पर्धेत कार्लसनवर दोन विजय मिळवणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी आनंद यांनी 2007 मध्ये लिनारेस स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.







06/06/2026

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Address

250 C, Samajwadi Mahila Building, Shanivar Peth, Pune 30
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabuddh Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabuddh Bharat:

Share