Prabuddh Bharat

Prabuddh Bharat The official Facebook handle of the voice of social justice, equity and equality .
(334)

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा...
10/08/2026

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही महिन्यांतच उखडून गायब झाले आहेत. मात्र, हे स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी वापरण्यात आलेले तीक्ष्ण लोखंडी खिळे आणि बोल्ट सध्या रस्त्यावर उघडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने रस्त्यावर उघडे पडलेले धोकादायक खिळे व बोल्ट त्वरित हटवावेत आणि त्याठिकाणी दर्जेदार नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत. अन्यथा मनमाड नगरपालिकेच्या पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहीरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर उघडे पडलेले लोखंडी खिळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने घसरून किंवा खिळ्यांवर आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याबरोबरच फाटण्याच्या घटनांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचणे तसेच रात्रीच्या वेळी अंधार असणे यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांचा पाय उघड्या खिळ्यांवर पडून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून उघडे पडलेले सर्व खिळे व बोल्ट तात्काळ काढावेत आणि संबंधित ठिकाणी चांगल्या दर्जाचे नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, अमोल केदारे, अशपाक शाह, खुशाल थोरात, रूपेश जाधव, सागर गाडे, सुनील बागुल यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

10/08/2026

शरद पवार गटाचे खासदार मोदींना डिलिमिटेशन बील संदर्भात भेटायला गेलेत.

: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी


मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात त...
10/08/2026

मांडेगाव येथे 'जय भीम बुद्ध विहारा'चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

मांडेगाव : द बौद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) व समता सैनिक दल संचलित मांडेगाव येथील 'जय भीम बुद्ध विहार' इमारतीचे छत दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी अचानक खाली कोसळल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या विहारात दररोज सायंकाळी लहान मुलांचे शालेय शिक्षण तसेच संस्कार वर्ग घेतले जातात. दुर्घटना घडली त्या क्षणी सुदैवाने मुले तेथे नसल्याने मोठा अनर्थ टळला; अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत मांडेगाव बौद्ध बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल (संस्थापक बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेगाव येथे बुद्ध विहाराचे कार्य चालते. मागील काही वर्षांपासून येथील बौद्ध बांधवांनी एका सभागृहाचे विहारात रूपांतर करून तेथे बुद्ध रूप व विहाराचे स्वरूप दिले आहे. सध्या दि. २९ जुलै २०२६ पासून वर्षावासानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका संस्कार विभाग प्रमुख ज्ञानदेव सोनवणे गुरुजी यांच्या उपस्थितीत हे उपक्रम सुरू आहेत. गुरुजी विहारात उपस्थित असतानाच ही छत कोसळल्याची घटना घडली, ही मांडेगावसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्थानिक बुद्ध विहार कार्यकारिणी आणि ग्रामस्थांनी मांडेगाव ग्रामपंचायतीकडे वारंवार विहारासाठी अथवा 'संविधान भवना'साठी जागेची मागणी केली आहे. याशिवाय दलित निधीतून विहाराच्या खिडक्या, रंगकाम आणि वॉटरप्रूफिंग दुरुस्तीची मागणी अनेक निवेदनांद्वारे करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायतीने या सर्व मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांना केराची टोपली दाखवली. स्थानिकांनी स्वतः वर्गणी जमा करून दुरुस्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ते कामही करू दिले गेले नाही, असा गंभीर आरोप कार्यकारिणीने केला आहे.

"दररोज सायंकाळी लहान मुले या ठिकाणी अभ्यासासाठी आणि संस्कार वर्गासाठी येतात. छत खाली पडल्यामुळे जर लहान मुलांना दुखापत झाली असती किंवा एखादी जीवितहानी झाली असती, तर याला जबाबदार कोण?" असा थेट सवाल जय भीम बुद्ध विहार कार्यकारिणीने केला आहे.

ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदार कारभाराचा जाहीर निषेध नोंदवत येत्या १५ ऑगस्ट रोजी (स्वातंत्र्यदिनी) मांडेगाव ग्रामपंचायतीला निवेदन देऊन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे.

हा जाहीर निषेध व आंदोलनाचा इशारा जय भीम बुद्ध विहार कार्यकारिणीचे अध्यक्ष रामभाऊ सोनवणे, सरचिटणीस कैलास सोनवणे, कोषाध्यक्ष राजेंद्र हिरालाल खुरंगळे, कार्यालय सचिव अमृतानंद ज्ञानदेव सोनवणे, हिशोब तपासणीस रणजीत लक्ष्मण सोनवणे तसेच रत्नदीप ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व बौद्ध समाजाने दिला आहे.

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेशनवी मुंबई : ईश्वरनगर, दिघा येथे शेक...
10/08/2026

ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

नवी मुंबई : ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी धम्मदूत बुद्ध विहार, ईश्वरनगर (दिघा) येथे पक्षप्रवेश व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मिलिंद लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

ईश्वरनगर, दिघा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल अंगरख यांच्यासह परिसरातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. इतर पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला जातो; मात्र वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्त्यांना मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा दिली जाते. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असल्याने त्याला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.”

ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सामाजिक भान जपत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करावे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्यातील एक निर्णायक राजकीय शक्ती म्हणून पुढे येईल. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, बेरोजगार, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नांवर धारेवर धरण्याची भूमिका पक्ष प्रभावीपणे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मल्लीनाथ सोनकांबळे, ऐरोली तालुका अध्यक्ष राजेश भालेराव, मिलिंद लहाने आणि अनिल अंगरख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यात विक्रांत कांबळे, सुरेश शिवशरण, महेश बनसोडे, पवन सोनवणे, विजय चंदनशिवे, स्वप्निल पवार, संतोष सकपाळ, यशवंत म्हस्के, तुळशीराम भोसले, भास्कर सरदार, हरी कट्टीमनी, गायकवाड, सतीश शिवशरण, शुभम शिंदे, निहाल शिशुपाल, दिनेश गुप्ता, मोनू मोर्या, गौतम जैस्वार, दिलीप मुंडेनकेरी, रोशन म्हस्के, गणेश अंगरख, संजय जैस्वार, बाबला मुन्ना आणि सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ईश्वरनगर, दिघा परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वासमुंबई: आपल्या आगळ्यावेगळ्या चि...
10/08/2026

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

मुंबई: आपल्या आगळ्यावेगळ्या चित्रशैलीने कला व साहित्य विश्वावर विशेष ठसा उमटवणारे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार आणि कवी श्रीधर अंभोरे यांचे काल, ९ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कोणतेही औपचारिक किंवा पाठ्यगत कलाशिक्षण न घेता अंभोरे यांनी स्वप्रयत्नाने स्वतःची एक स्वतंत्र आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली विकसित केली होती. त्यांची चित्रे ही केवल बाह्य सौंदर्यापुरती मर्यादित न राहता विचारांना चालना देणारी असत.

मराठी साहित्य विश्वाशी त्यांचे अतूट नाते होते. विविध मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांसाठी तसेच प्रसिद्ध दिवाळी अंकांसाठी त्यांनी ३०० हून अधिक मुखपृष्ठे रेखाटली होती. विशेष म्हणजे, या अथांग कलासेवेसाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतला नाही; कला आणि साहित्यावरील निस्सीम प्रेमापोटी त्यांनी हे योगदान दिले.

एक संवेदनशील चित्रकार असण्यासोबतच ते एक प्रतिभावान कवीही होते. त्यांच्या जाण्याने एक स्वयंभू आणि व्रतस्थ कलाकार हरपल्याची भावना कला-साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! - संजीव चांदोरकर सव्वाशे वर्षांपेक्षा जुन्या , सर्व मुबई शहर आणि उपनगरांना सेवा दे...
10/08/2026

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst !

- संजीव चांदोरकर

सव्वाशे वर्षांपेक्षा जुन्या , सर्व मुबई शहर आणि उपनगरांना सेवा देणाऱ्या मूळ झाडावर दहा वर्षांपूर्वी वेट लीज / कंत्राटावर घेतलेल्या बसेसचे बांडगुळ चढवले गेले आणि ….आता मूळ झाडच नाहीसे होऊन तेच बाडगुळ झाड म्हणून मिरवत आहे.

दहा वर्षांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या स्व मालकीच्या ४००० बसेस होत्या , वेट /लीज / कंत्राटावर एकही बस नव्हती. आता बेस्टच्या ताफ्यात २,८२९ बसेस आहेत आणि त्यातील फक्त २२९ स्व मालकीच्या आहेत.

मुंबईत मेट्रो सेवा सुरु झाली वगैरे कारणे दिली जात आहेत. पण मुंबईत लोकल ट्रेन असू देत नाहीतर मेट्रो , बेस्ट बसेस नेहमीच पूरक सेवा देत आली आहे. अजूनही त्याची गरज आहे..

स्व मलिकच्या बसेस कमी करण्यासाठी खरे कारण आहे बेस्टचा सांगितला गेलेला वित्तीय तोटा ; जो पाच वर्षांपूर्वी २,१०० कोटी रुपये होता तो आता ४००० कोटीं रुपयांच्या घरात गेला आहे. हे सांगितले जात नाही की त्याच काळात महानगरपालिकेकडून मिळणारी मदत २,६०० कोटी रुपयांवरून फक्त ५०० कोटीवर आणली गेली आहे (सर्व आकडेवारी लोकसत्ता ऑगस्ट ९ २०२६, पान क्रमांक १)

खरे कारण अजून वेगळे आहे. बेस्ट डेपोच्या शहरातील अत्यन्त मोक्याच्या ठिकाणच्या डेपोच्या १३२ एकर्स जमिनी राज्यकर्त्यांच्या गोटातील कंपनी समूहाला द्यायच्या आहेत. ज्याचे बाजारमूल्य काही हजार कोटी रुपये आहे.

या सगळ्याच्या मागे आहे. वित्त भांडवलाचे तर्कशास्त्र (लॉजिक ऑफ फायनान्स). जे त्यांनी अगदी सामान्य नागरिकांच्या डोक्यात फिट्ट बसवले आहे. ब्रेनवॉश केला आहे.

वित्तीय तोटा म्हणजे पाप . तो फक्त भ्रष्टाचारामुळे होतो. वित्तीय तोटा म्हणजे अकार्यक्षमतेचा पुरावा असतो इत्यादी. “हा असा तोटा सरकार वा महानगरपालिका किती वर्षे सहन करणार” हे शासकीय प्रवक्तेच नाही अगदी बेस्टवर अवलम्बून असणारे सामान्य मुंबईकर देखील असेच तर्कट बोलतात.

त्यामुळे वित्तीय तोटा म्हणजे काय ; कार्यक्षमता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी वित्तीय (Financial Efficiency) व “वास्तविक” (Physical Efficiency) कार्यक्षमतेत फरक केला गेला पाहिजे.

सार्वजनिक वाहतूक उपक्रमाची “वास्तविक” कार्यक्षमता कशी मोजायची ? त्याला बरेच आयाम आहेत. डिझेल, गॅसच्या प्रत्येक युनिटला किती मायलेज मिळते, नवीन टायर किती किलोमीटर सर्व्हिस देतो, एकूण ताफ्यापैकी किती बसेस दररोज रस्त्यावर धावतात, किती ब्रेक डाऊन होतात, किती बसेस वेळेवर थांब्यावर पोचतात, दिरंगाईने पोचल्या तर त्यात ड्रायव्हरांची चूक किती, स्टाफमध्ये दांड्या मरणाऱ्यांचे प्रमाण किती, कंडक्टर प्रत्येक प्रवाशांकडून पैसे वसूल करतो कि नाही अशी यादी करता येईल.

बेस्टच्या कंत्राटीकरणला विरोध करणाऱ्या कामगार , कर्मचारी , नागरिकांच्या संघटना यांनी आम्ही कार्यक्षमतेच्या बाजूनेच आहोत हे पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज आहे

त्याचवेळी कंत्राटावर चालवल्या जाणाऱ्या बसेसचे मूल्यमापन केले गेले पाहिजे. बस न चालवता पैसे दिले जातात का ? या बसेसने आतापर्यंत किती अपघात केले ? त्यांच्या सेवेची गुणवत्ता काय ? बेस्ट त्यांना किती पैसे देते ?

याला जोड दिली पाहिजे अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक उपक्रम मुंबईसारख्या महानगरात चालवला तर नागरिकांचे किती उत्पादक तास वाचतील ? किती पैसे वाचतील ? रस्त्यावरील खाजगी वाहनाची संख्या आणि म्हणून ट्राफिक जॅम , म्हणून वायू प्रदूषण किती कमी होईल याची शास्त्रीय आकडेवारी गोळा करून, आणि त्याचे रुपयातील मूल्य जे काही हजार कोटी रुपये असेल, मांडली पाहिजे

एवढे सगळे केल्यावर हे कळेल की समाजातर्फे / नागरिकांतर्फे बेस्ट उपक्रमाला सबसिडी देणे हे सामाजिकच नाही तर आर्थिक निकषांवर देखील समर्थनीय आहे. कारण सबसिडी म्हणजे जनतेच्या एका खिशातून दुसऱ्या खिशात पैसे घालणं. राजकीय नेत्यांच्या खिशातून नाही. मतदार नागरिक ठरवणार त्यांच्या पैशाचा विनियोग कसा होणार ते

महानगरपालिका वा राज्य सरकार यांनी बेस्टची वित्तीय स्वयंपूर्णतेची (Financial Sustainability) जबाबदारी घेतली पाहिजे. .

जेन झी च्या आंदोलनातील गाभ्याचा संदेश काय आहे ? हे आमचे आयुष्य आहे, शिक्षण / रोजगार आमचा हक्क आहे. राज्यकर्ते आम्ही निवडून देतो. म्ह्णून त्यांना जाब विचारणे , प्रचलित धोरणात बदल करण्याची मागणी करणे हा देखील आमचा हक्क आहे. तो आम्ही रस्त्यावर येऊन बजावणार !

मुंबईकरांनी जेन झी ने दिलेला संदेश मनावर घ्यावयास हवा ; मुंबई आमची आहे. बेस्ट सेवा आमच्या हक्काची आहे म्हणून एकत्र यावे. या मागणीने जोर धरला तरच ती मागणी निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात प्रतिबिंबित होईल. राजकीय नेत्यांना फक्त नंबर्सची भाषा कळले. विश्लेषण , वैचारिक मांडणीची नाही

ममदानी यांनी मुंबई सारख्या भल्या मोठ्या न्यूयॉर्क शहराची महापौर पदाची निवडणूक , सार्वजनिक वाहतूकची गुणवत्ता सुधारणार , सामान्य नागरिकांना परवडणारी करणार या व अशा मांडणीवर जिंकून दाखवली आहे. लक्झेंबर्ग शहराने सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक मोफत केली आहे. जगातील अनेक मोठ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक सबसिडी वरच चालते.

सार्वजनिक वाहतुकीच्या मुद्यावर सामान्य मुंबईकर संघटित व्हायला हवे आहेत. त्यासाठी त्यांची अर्थ वित्त साक्षरता वाढवण्याची गरज आहे.

मुंबई नागरिकांनी बेस्ट निराळ्या पायावर उभी केली तर देशातील अनेक शहरांसाठी आणि तेथील नागरिकांसाठी ते रोल मॉडेल होईल.

पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावरपिंपरी : पिंपरी-चिंच...
10/08/2026

पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दत्तनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) प्रकल्प, कथित वृक्षतोड आणि संबंधित विभागांच्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा शारदा राजू बनसोडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. विविध आठ मागण्यांसाठी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भीमसृष्टी स्मारक, पिंपरी येथे हे उपोषण सुरू करण्यात आले.

दत्तनगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक ५२३२ तसेच गट क्रमांक १२१ व ११९ या मिळकतींबाबत पिंपरी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ६१७/२०२६ न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित एसआरए प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी बनसोडे यांनी केली आहे.

एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली संबंधित विकासकाकडून बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित विकासक आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून विकासकाला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस देण्यात आल्यानंतरही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दत्तनगर एसआरए प्रकल्पासाठी राज्य शासनाची मंजुरी कशा पद्धतीने घेण्यात आली, नागरिकांच्या हरकतींची दखल घेण्यात आली का, याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जमिनीच्या मोजणी, पुनर्वसनासंदर्भातील अहवाल आणि अभिप्राय तयार करताना नागरिकांना नोटीस किंवा हरकतीची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दत्तनगर येथील झोपड्या हटविण्यासाठी १० ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त देण्यात येऊ नये, अशी मागणीही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगासमोर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एसआरए प्रकल्पाला स्थगिती देऊन संबंधित प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम १५४ तसेच कलम ३७ (१) अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतही बनसोडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी एसआरए प्रकल्पाला विरोध करून हरकत नोंदविल्यानंतरही आपल्याला सुनावणीसाठी बोलावण्यात आले नसल्याचा त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या मंजुरीची प्रक्रिया, नागरिकांच्या हरकती आणि सुनावणीबाबत खुलासा करून संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’औरंगाबाद : खुलताबाद रस्त्यावर अस...
10/08/2026

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

औरंगाबाद : खुलताबाद रस्त्यावर असलेल्या धोकादायक दुभाजकामुळे सातत्याने अपघात होत असून, वारंवार अपघात होऊनही हा दुभाजक हटविण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (ता. ८) अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दुभाजकाचा प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’ करून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष रंगनाथ भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खुलताबाद रस्त्यावरील सदर धोकादायक दुभाजकाला पुष्पहार अर्पण केला. तसेच या दुभाजकामुळे आतापर्यंत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा दुभाजक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. दुभाजकावर पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना, प्रतिबिंबित पट्टे अथवा योग्य प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून, काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

दुभाजकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलेल्या या प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’ आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. धोकादायक दुभाजक तातडीने हटवावा किंवा त्याठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.

10/08/2026

LIVE : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर पत्रकार परिषद | Sujat Ambedkar Press Conferance

10/08/2026

शाळकरी मुलींचं 'रिपोर्टिंग'! छत्रीचा माईक करत PWD ला दाखवला आरसा, राज्यात Video ची चर्चा

Address

250 C, Samajwadi Mahila Building, Shanivar Peth, Pune 30
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabuddh Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prabuddh Bharat:

Shortcuts

Share