झक्कास मराठी

झक्कास मराठी झक्कास महाराष्ट्राचं....झक्कास नेटवर्क... झक्कास मीडिया नेटवर्क

चोराच्या उलट्या बोंबा – महाराष्ट्र कुठे चाललाय?सोळापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात मुरूम चोरीवर DySP अंजना कृष्णा यांनी कार...
05/09/2025

चोराच्या उलट्या बोंबा – महाराष्ट्र कुठे चाललाय?

सोळापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात मुरूम चोरीवर DySP अंजना कृष्णा यांनी कारवाई केली आणि तिथूनच संपूर्ण वाद पेटला. कारवाई सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, हा मुद्दा सगळीकडे गाजतोय. एखाद्या निवडून आलेल्या नेत्याने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला दबाव आणणे हा सरळसरळ सत्तेचा दुरुपयोग आहे. प्रशासनावर अशा प्रकारे हस्तक्षेप झाला तर सामान्य जनतेला न्याय कोण देणार?

या वादानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र सगळाच खेळ उलटा करून टाकला. त्यांनी UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करावी, असा प्रस्ताव मांडला. पुजा खेडकर प्रकरणाचा दाखला देत त्यांची नियुक्ती बनावट कागदपत्रांवर झाली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पण ठोस पुरावे कुठे आहेत? चौकशी करण्याची वेळच निघून गेली आहे, मग हा आरोप फक्त राजकीय गाजावाजा नाही का? थोडक्यात सांगायचं तर मिटकरींचं पत्र म्हणजे राजकीय निष्ठा दाखवण्यासाठी केलेला रडीचा डावच वाटतो.

प्रश्न इथेच संपत नाही. अंजना कृष्णा यांनी कायद्याच्या चौकटीत काम केलं, म्हणून त्यांच्यावरच संशय व्यक्त होतोय. आणि ज्यांनी कारवाई थांबवण्यासाठी फोन केला त्यांच्यावर मात्र चौकशीच नाही? हा तर सरळ चोराच्या उलट्या बोंबाचा प्रकार आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मिटकरींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं – “चौकशी झालीच पाहिजे तर ती अजित पवार आणि त्यांच्या कंपन्यांची झाली पाहिजे, अंजना कृष्णा यांची नाही.” म्हणजेच जनतेचा खरा प्रश्न आहे मुरूम माफियांचा आणि त्यांना राजकीय पाठीशी असणाऱ्यांचा. पण चर्चेचं लक्ष्य वळवलं जातंय अधिकाऱ्यावर.

आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती का निर्माण होतेय की, कायद्याने काम करणारा अधिकारी आरोपी ठरतोय आणि दबाव टाकणाऱ्यांचा बचाव होतोय? ही प्रवृत्ती सुरू राहिली तर उद्या कोणताही प्रामाणिक अधिकारी सुरक्षित राहणार नाही. मग लोकशाही उरणार कशी?

महाराष्ट्राला काय हवंय? प्रामाणिक प्रशासन की राजकीय रडारड? राजकारणासाठी अधिकाऱ्यांना बदनाम करणं हा खेळ बंद व्हायला हवा. नाहीतर लोकांचा विश्वास कोसळेल, आणि मग लोकशाही फक्त कागदोपत्री उरेल.

सगळेजण खिचडी खायला तयार होते, फक्त यांनाच चपाती खायची होती.😅😅😅   #
03/09/2025

सगळेजण खिचडी खायला तयार होते, फक्त यांनाच चपाती खायची होती.
😅😅😅

#

अशाच पोस्ट दररोज पाहण्यासाठी झकास मराठी या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा  .in
31/08/2025

अशाच पोस्ट दररोज पाहण्यासाठी झकास मराठी या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा

.in

शाळेत असताना ज्या कलाकारांच्या मालिका आवडीने बघायचो त्यातले बरेच कलाकार आता एक तर निवृत्त झालेत किंवा प्रसिद्ध झोता पासू...
31/08/2025

शाळेत असताना ज्या कलाकारांच्या मालिका आवडीने बघायचो त्यातले बरेच कलाकार आता एक तर निवृत्त झालेत किंवा प्रसिद्ध झोता पासून दूर झालेत इथपर्यंत ठीक होतं परंतु काही वर्षांपूर्वी टीव्हीवर बघितलेले इतके सुंदर गोड चेहरे अकाली एखाद्या जीव घेण्या रोगाने आपल्यातून निघून जावे हे धक्कादायक आहे.

इंस्टाग्राम वर आत्ता चेक केलं तेव्हा ऑगस्ट 2024 मध्ये केलेल्या शेवटच्या पोस्ट दिसतात. तिने कोणालाही सांगितलं नाही. कुणाचीही सहानुभूती घेतली नाही तिला विजयी होऊन परत यायचं होतं पण...........☹️
Too young to go, Too graceful to forget ✨🩷❤️

- अंजली झरकर

21/08/2025

मायची शप्पथ खरं सांगतो जेवढे लंडनला गेलेत त्यांना लोकमत वाल्यांनी येड्यात काढून काही लाख रुपये प्रति घेऊन कसला की पुरस्कार म्हणून नेलय आणि जाणारे सुद्धा फक्त मजा करायला गेलेत आणि तिथून कलेक्टरला दाबायलेत जा आणि दुष्काळाची पाहणी करा शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला द्या तुम्ही कुठं लंडनला वारे पुरस्कार हे जर खोटं असेल तर माहिती काढून तुमच्या चपलेने मला मारा हवे तर.... आमच्यापैकी बऱ्याच जणांना येता का आणि पुरस्कार घेता का म्हणून विचारणा झाली होती म्हणून सांगतो....

आपलाच विशाल बुधवंत

🤪🤪

2009 साली  #सुखांत नावाचा अतुल कुलकर्णी कविता मेढेकर आणि ज्योती चांदेकरांचा सिनेमा आला होता. इच्छामरणाची थीम होती. चित्र...
17/08/2025

2009 साली #सुखांत नावाचा अतुल कुलकर्णी कविता मेढेकर आणि ज्योती चांदेकरांचा सिनेमा आला होता. इच्छामरणाची थीम होती. चित्रपटाच्या पहिल्या पाच मिनिटात फक्त धडधाकट दिसणारी अतुल कुलकर्णी ची आई म्हणजे ज्योती चांदेकरचा एक्सीडेंट होतो. ती बेड रिडन होते.
आता इथून पुढे उठूनही बसता येणार नाही हे समजल्यानंतर आईने व्यक्त केलेली इच्छामरणाची इच्छा, आईचा आणि मुलाचा भावनिक संघर्ष, आई घरामध्ये पडून राहिल्यानंतर कुटुंबामध्ये निर्माण झालेले ताणतणाव, सगळ्या लोकांनी आईला समजावण्याचा प्रयत्न करूनही इच्छामरणावर ठाम राहिलेली आई आपल्या आईसाठी इच्छामरणाची याचिका सुप्रीम कोर्टात घेऊन गेलेला वकील मुलगा आणि अत्यंत अनपेक्षित शेवट इतका ताकदीचा प्लॉट होता.

आपल्या मराठी मध्ये चांगले चित्रपट मार्केटिंग नसल्यामुळे चित्रपटांना प्राईम स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे आणि मुळात मराठी लोकांची मराठी भाषेतले चित्रपट बघण्याची इच्छा नसल्यामुळे विस्मरणात जातात.

या चित्रपटात ज्योती चांदेकरांनी मध्यवर्ती भूमिका इतकी जबरदस्त रंगवली होती. त्या भूमिकेशी इतक्या एकरूप झाल्या होत्या की अक्षरशः खरोखर एखादी बाई बेड रिडन पडल्यानंतर ज्या पद्धतीने गलितगात्र असाहाय्य आणि रोगट दिसेल त्या पद्धतीने चित्रपटामध्ये त्यांनी स्वतःला मोल्ड केलं होतं!🩷🌿 या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील त्यावर्षी मिळाला होता.

अशा या अष्टपैलू ज्येष्ठ गुणी अभिनेत्रीने रंगमंचावरून एक्झिट घेतली आहे. त्यांच्या पश्चात तेजस्विनी पंडित ही त्यांची अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारी मुलगी आणि दुसरी पौर्णिमा आज पोरक्या झाल्या आहेत पण त्याच्याबरोबर अभिजात मराठी कलासृष्टी सुद्धा पोरकी झाली आहे कारण असे कलाकार कलेची शान वाढवणारे असतात. भाषेचा, प्रदेशाचा अभिजात दर्जा उंचावणारे असतात. ज्योती चांदेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🤍🌿🙏🏿

- अंजली झरकर

🩷❤️🩷
17/08/2025

🩷❤️🩷

देवेंद्र फडणवीसंच्या या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का?
17/08/2025

देवेंद्र फडणवीसंच्या या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का?

पुण्याच्या दुर्वांकुर हॉटेलचे मालक शाम मानकर यांची एबीपी माझा ने जी घेतलेली मुलाखत आहे ती तुम्ही ऐकली आहे का? त्यांची बे...
14/08/2025

पुण्याच्या दुर्वांकुर हॉटेलचे मालक शाम मानकर यांची एबीपी माझा ने जी घेतलेली मुलाखत आहे ती तुम्ही ऐकली आहे का? त्यांची बेचाळीस वर्षांची मुलगी शीतल शिंदे मानकर हिचा फुफ्फुस निकामी झाल्यामुळे
याच वर्षी जानेवारी महिन्यात मृत्यू झाला पण त्याचं कारण होतं ती ज्या पुण्यातल्या ताडीवाला रोड प्रभागात राहत होती तिथे सतत येणारे कबुतरे.

बर तिला हा जो रोग झाला होता त्याचे निदान शाम मानकरांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले नाही तर अत्यंत तज्ञ आणि निष्णात डॉक्टरांनी हे निदान केलेले आहे. पहिल्यांदा खोकल्यापासून सुरुवात झाली तो खोकला काही थांबेना आठवड्याचे महिने झाले महिन्याचे वर्ष झाले. वेगवेगळ्या स्पेशालिस्ट कडे तपासणी करताना पुण्यातल्या 80 वर्षे वयोवृद्ध एका तज्ञ डॉक्टरांनी विचारले की तुमच्या इथे कबुतरे येतात का तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही गोष्ट खरी आहे गच्चीमध्ये सोसायटीमध्ये कबुतरांना दाणे टाकले जातात त्याच्यामुळे खिडक्या घराचे कोपरे गच्ची इथे सतत कबुतरांचा वावर आहे त्यांच्या विष्ठेचा देखील त्रास आहे. ही विष्ठा वाळल्यानंतर पावडर फॉर्ममध्ये हवेत पसरून जर श्वसन मार्गाने फुफ्फुसात गेली तर फुफ्फुसांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. हे देखील डॉक्टरांनी केलेले निदान आहे.
संपूर्ण सात वर्ष शितल मानकर यांचा आयुष्य प्रचंड
हालअपेष्टमध्ये गेलं त्यांना श्वास घेता यायचा नाही शेवटी शेवटी सिलेंडर घेऊन सगळीकडे फिरावे लागायचं रात्री झोप लागायची नाही. फक्त थोडस टेकून बसल्यानंतर तिला थोडं बरं वाटायचं. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर त्यांना परत पुनर्जीवित करण्याचा दुसरा कुठला उपाय नव्हता फक्त प्रत्यारोपण हा एकच उपाय होता तशी संधी देखील त्यांना दोनदा आली परंतु दुर्दैवाने फुफ्फुस मॅच होऊ शकलं नाही. त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आता लोक असा युक्तिवाद करत आहेत की फक्त एकाच केस ने नियम लागू होत नाही. असल्या मूर्ख डोक्याच्या लोकांना अजून किती बळी गेल्यानंतर नियम लागू होतो हे लक्षात येईल? यांच्या समाधानासाठी अजून हजारो लोकांचे बळी जायला पाहिजेत आणि ते डॉक्टरांनी ते सर्टिफाय पण केले पाहिजेत ? की हे कबुतरांमुळे झालं? त्याच्यानंतर यांची डोके ठिकाणावर येतील का? त्याच्यासाठी बाकीच्या लोकांनी जीव गमवायचे का?

कबुतरे रानटी पारवे यांच्या घाणीचा अत्यंत भयानक त्रास शहरातल्या लोकांना भोगावा लागत आहे. याच्या विरोधात मोठी मोठी बेताल वक्तव्य करणाऱ्या जैन मुनीने आंदोलन करण्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये अगोदर कबुतरखाना पाळून बघितला पाहिजे त्याचे परिणाम सहा महिन्यात घरातल्या लोकांवर काय होते ते बघितलं पाहिजे मग रस्त्यावर उतरले पाहिजे.

Additionally या लोकांना विरोध करणाऱ्या मराठीकरण समितीच्या लोकांना सरकारच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणांमध्ये जिथे आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो जिथे कोर्टाचे डायरेक्शन आहे तिथे सरकार भलत्याच लोकांना पाठीशी घालून आपल्याच लोकांवर तलवार उगारत आहे हे किती दुर्दैवी आहे.

- अंजली झरकर

तुम्ही प्रियांकाच्या वाक्याशी सहमत आहात का?
13/08/2025

तुम्ही प्रियांकाच्या वाक्याशी सहमत आहात का?

मागे कुणीतरी ग्रुप वर कबूतर विष्ठा आणि त्याचे परिणाम याबद्दल लेख टाकला होता. त्यावेळी ती गोष्ट इतकी सिरियस असेल असे मला ...
07/08/2025

मागे कुणीतरी ग्रुप वर कबूतर विष्ठा आणि त्याचे परिणाम याबद्दल लेख टाकला होता. त्यावेळी ती गोष्ट इतकी सिरियस असेल असे मला वाटले नव्हते पण...खाली नमूद केलेली/घडलेली सत्य घटना आहे.👇👇👇

कबुतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त 6 महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो.

यावर विश्र्वास बसत नाही ना...!
पण हे खरे आहे. दोन आठवड्यापूर्वी कबुतर विष्ठा या कारणे ठाणे इथे राहणारा जवळचा मित्र मी गमावला.

मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रिल मधे AC च्या duct unite च्या आजुबाजूस कबुतर निवास आणि विष्ठा जवळजवळ तीन महिने होती. दुर्लक्षित कबुतरे अंडी पिल्ले काटक्या विष्ठा यात राहत होती.

AC मधून जी हवा घरात येते त्यातून सुकलेल्या विष्ठे मधील सूक्ष्म जंतू युक्त धूळ घरात जाईल याची तिळमात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.

कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ AC च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आतमधे जाते आणि तेथून आत येणारा पाईपमधुन हे जंतू बंद AC तून आत प्रवेश करतात. खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतू संसर्ग होतोच. हे जंतू पाणी, फिनेल, ॲसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे...हे रिपोर्ट मधे हे लिहिलेले होते.

Report मधे लिहिलेली लक्षणे.. अशक्तपणा, सूका खोकला, ताप, पोटशूळ, सहजच घाम येणे, अंगाला सूज येते जाते, ऑक्झिजन लेव्हल कमी होणे, चीड चीड. विशेष एक लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे हे आहे...हे report मधे वाचून हादरलोच.

45 शी चा मित्र दोन महिने आजारपणामुळे त्रस्त होऊन एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.

योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेले आणि उपचार चालू केले, ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धापकाळाने निवर्तले.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले.
(हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)

Doctor Kapoor हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.

Lungs आणि श्वासनलिका पूर्ण infected झाली होती....Report आले त्यात 60 % Lungs निकामी झाले होती हे नमूद केले होते.

चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली. पण फार उशीर झाला होता आणि "यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा" हे डॉक्टर जेव्हा म्हणाले तेव्हा तो मित्र हादरला.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस मधे नक्की होते काय...???

Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.
रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो.

विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही. प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो effect होतोच.

Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही. कारण उपलब्धता नाही आणि costly आहे. शेवट म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले. आम्ही सर्व मित्र 2 मास्क नाकातोंडावर बांधूंन वैकूंठवासी यात्रेत सामील झालो.

कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.

आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे फूफ्फुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.
उपचार सुरू आहेत पण पुढचं संपूर्ण आयुष्य हे श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब मी पाहिले.
वाईट वाटले पण शुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला...

SO SAD...BUT REALITY.

या विषय संदर्भात जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा
खटाटोप केला...कबुतर या विषयास थारा देऊ नये...

कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात पण कबुतर हे फार गलिच्छ आहे.
त्यामुळे रोग संक्रमण पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असते. काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठातून निर्माण होतात त्या सुईच्या टोका पेक्षा सूक्ष्म असतात.

मुंबई (zoo) प्राणी संग्रहालय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला.

इतर पशूपक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणुन झाडाला पूरक असते.

कबुतर, वटवाघूळ, गिधाड, तरस आणि कमोडो ड्रॅगन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.

शक्यतो कबुतर आसपास वास्तव्य करणार नाही हाच यावर एक जालीम उपाय आहे.

अपने गुलाब चाचा की प्यारीसी देन शांतीदूत होकर मौत को बुलावा देती है...यह अपने आंखों से देखा है...

योगेश पराडकर.
२७.०२.२०२३.
मामुली कबुतर से जुडी एक आखों देखी...सत्य घटना...

07/08/2025

🚌 अंबाजोगाई ते उजनी मार्गावर एसटी महामंडळाच्या बसमध्ये गळती – प्रवाशांचे हाल 🌧️

अंबाजोगाई – मुसळधार पावसात अंबाजोगाईहून उजनी कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये पाण्याची गळती होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बसच्या छतामधून व खिडक्यांमधून पाणी गळत असल्यामुळे प्रवाशांना ओल्या सीटवर बसावे लागले आणि संपूर्ण प्रवासात त्रास सहन करावा लागला.

ही बस खचलेल्या देखभालीमुळे पावसात पूर्णपणे अपयशी ठरली. छप्परातून सतत पाणी टपकत असल्याने काही प्रवाशांनी छत्र्या आणि पिशव्या वापरून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत वृद्ध, महिला आणि लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागला.

हा प्रकार प्रवासी सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित करतो. एसटी महामंडळाने वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

🛑 संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन बसची त्वरित दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे.

#महाराष्ट्रराज्यमार्गपरिवहन #प्रवासीहक्क

Address

Sant Tukaram Paduka Chauk, Fc Road Pune
Pune
433007

Alerts

Be the first to know and let us send you an email when झक्कास मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to झक्कास मराठी:

Share

“झक्कास मराठी"

“झक्कास मराठी” - महाराष्ट्राची मराठी अस्मिता जपणारं मराठमोळं पेज

झक्कास मराठीवर तुम्हाला दररोज माहिती-ज्ञान-तंत्रज्ञान आणि मनोरंजनपर पोस्ट्स पाहायला मिळतील.

झक्कास हे पेज ऑनलाइन प्रमोशन करणाऱ्यापैकी एक आहे. आमच्याकडे असलेल्या अनुभवाने आम्ही आपले चित्रपट, वेबसिरीज व व्हिडिओ आणि ग्राफिक्स प्रमोशन करू शकतो.

■ संपर्क : [email protected]