संवेदनेची शाळा

संवेदनेची शाळा समाज, शिक्षण, निसर्ग, शेती, खूप काही

29/08/2025


समर्थ 2037 पर्यंत हवेत उडणाऱ्या गाड्या बनवणार! कशा ते समर्थकडून सर्व समजून घ्या.
, #जिल्हा_परिषद_शाळा
#शिक्षण #विद्यार्थी #शिक्षक

 #खरे_हिजडे_कोण…?  #खरे_मर्द_कोण..?अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळालं नव्हतं.. जनरल डब्यात जागा प...
28/08/2025

#खरे_हिजडे_कोण…?
#खरे_मर्द_कोण..?
अचानक मुंबई ला याव लागल्यामुळे रेल्वेच Reservation मिळालं नव्हतं.. जनरल डब्यात जागा पकडण्यासाठी दादा आणि मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशन वर येवुन बसलो होतो.देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊ ला होती..साडे आठ ला गाडी फ्लॅट फाॅर्म वर लागली.... अपेक्षेप्रमाणेच जनरल डब्यात गर्दी Cst लाच झाली होती..डब्यात पाय ठेवायला ही जागा उरली नव्हती..
ईतक्यात गाडीत एक ऐन २० तली मुलगी आली तिच्यासोबत एक २१-२२ वर्षाचा धड मिसरूट न फुटलेला मुलगा होता. मुलगी खुप सुंदर होती..पण चेहऱ्यावर चिंता स्पष्ट कळत होती.त्यांच्या वागण्याने ते पळून आलेले प्रेमी युगुल होते अस वाटत होत..कदाचित दुसऱ्या राज्यातून ते मुंबई ला पळून आले होते.त्यांची भाषा आणि अंगावरचा पेहरावावरून ते तामीळनाङु-कर्नाटकाचे वाटत होते…ते दोघेही आमच्या सिट जवळ दरवाज्यात उभे राहीले..गाडी सुरु झाली.. डब्यातल्या सर्वच जणांच्या नजरा त्यांच्याकडे विशेषतः त्या मुलीकडे होत्या.. गाडी दहा पंधरा मिनीटातच दादरला आली आणि गाडीत दादर स्टेशन वरून ७-८तरुणांचा घोळका आमच्या डब्यात घुसला..शरीराने भारदस्त असलेल्या त्या मुलांच्या दाढी मिशा वाढलेल्या,केस रंगवलेले,अंगातले फॅशन च्या नावाखाली घातलेले विचित्र कपडे,तोंडात भरलेला गुटखा पाहून ते झोपडपट्टीचे वाटत होते..ते प्रेमी युगुल एकमेंकाशी काहीतरी बोलत होते भाषा समजत नव्हती पण पैशांवरून त्यांचा वाद चालु होता..पैसे संपले होते कदाचित त्यांचे..त्या मुलाने रागारागात तिला शिवी दिली आणि एक जोरात कानाखाली लगावली..त्या मुलीला अक्षरष: रडूच कोसळले..ती त्याला काहीच न बोलता चुपचाप बसली पण तिच्या ङोळ्यातलं पाणी सर्वकाही सांगुन जात होत..
https://www.facebook.com/Educationalsens
गाडी दादर स्टेशन वरून निघाली. त्या मुलालाही त्याची चुक कळाली आणि त्यालाही रडू आलं.. तिचा हातात हात घेऊन डोळयातले पाणी लपवत तिची समजुत तो काढु लागला..ते बोलण्यात गुंग झाले पण त्या दादर वरन चढलेल्या मुलांच्या घोळक्याची नजर त्या मुलीवर पङली..तिला रङताना पाहुन ते अश्शील विनोद करु लागले..मोठमोठ्याने घाणेरङ बोलुन हसु लागले..

ङब्यातल्या सर्व माणसांची वासनांध नजर त्या मुलीवर अगोदरच होती..त्या मुलीच्या ते केव्हाच लक्षात आल होत..त्या मुलालाही ते कळाल..मुलांच्या घोळक्यातले मुल किळसवाण्या घाणेरङ्या नजरेने त्या मुलीच्या छाती कङे एकटक पाहत होते..शरिराने नसला तरी ङोळ्यांनी ते तिच्यावर एक प्रकारे बलात्कारच करत होते…आधीच परेशानीत असलेल्या त्या प्रेमी युगुलाला अजुन त्रास देण्याचा प्रयत्न हे सर्वजण करत होते..ति बिचारी मुलगी स्वताची छाती झाकण्याचा इज्जतीला सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती..एव्हाना ठाणे आलच होत..ठाण्यात अजुन गर्दी वाढली आणी तो मुलांचा घोळका मुलीला खेटुन मुद्दाम उभा राहीला….गर्दीचा फायदा घेत त्या घोळक्यातला एक मुलगा तिला नको तिथे स्पर्श करु लागला..ती मुलगी स्वताच अंग चोरत बाजुला होत होती..मला ही ते लक्षात आलच होत..मी दादाला खुणावल आणी सांगितल ते पोर तिला छेङताय दादा..पण दादा ही काहीच न करता मला बोला तु चुपचाप बस,तुला काही देण घेण नाही..दादाच बोलण ऐकताच मन सुन्न पङल..मी दादाला बोलो “दादा तिच्या जागी आपली बहीण असती तर…?”

दादाने हिम्मत करुन त्या मुलाला सांगितल भाऊ जरा माग उभा रहा,लेङीज उभी आहे,त्यावर तो मुलगा बोला “ओय आयघाल्या तुही बहीण हाय का ती..,मंग शांत रहाय..कामाशी काम ठेव”
दादा त्याला काहीच बोलु शकत नव्हता..कारण घोळक्यातले सर्वच शरिराने भारदस्त आणी पट्टीचे असल्याने भांङणाला आमंत्रण देण्यासारखच..

दादा ने काहीच न बोलता त्या मुलीला दोघांच्या सिट मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभ रहायला सांगितल..ती तिथे उभी राहीली आणि तिच्या बाजुला तिच्या सोबत असणारा मुलगा उभा राहीला..डब्यात असणारे बाकीचे प्रवासी हा निर्लज्ज प्रकार डोळ्याने पाहून त्या मुलांना घाबरुन शांत बसले होते..मला ही आज पहिल्यांदा शरीरयष्ठीने कमकुवत असण्याची लाज वाटत होती..मी एका मुलीच रक्षण ईच्छा असताना सुध्दा करु शकत नव्हतो..
महाराजांच्या भूमीत हा किळसवाणा प्रकार मला डोळ्यासमोर पहावा लागत होता. .रेल्वे आता कसारा घाट जवळ जवळ आली होती..त्या घोळक्यातील मुलं तोंडातला गुटखा त्या मुली सोबतच्या असणाऱ्या मुलाच्या अंगावर थुकत होते.. त्या मुलाचं त्या मुलीच्या पाठी मागे स्पर्श करण चालुच होत.. गाडी आता कसारा घाटात पोहचली होती..

कसाऱ्याचे बोगदे सुरु झाले होते..अंधाराचा फायदा घेत घोळक्यातला मुलगा त्या मुलीच्या छाती वरण हात फिरवत होता..गाङी बोगद्यात गेल्यावर गाडीत अंधार होयचा अधीच पाऊस आणि वरून कालच झालेली अमावस्या ह्यामुळे आजची रात्र फारच अंधारी वाटत होती..अंधाराचा फायदा घेत तो मुलगा तिच्या पाठीमागे उभा राहुन तिला मिठी मारण्याचा तिची छाती दाबण्याचा घाणेरड्या प्रकार करु लागला.. आणि त्याचे मित्र हसुन अजुन त्याला प्रोत्साहन देत होते..तिच्यासोबतचा मुलगा त्याला हात पाय जोडून मागे उभा राहीला सांगत होता पण तो ते ऐकुन न ऐकल्या सारखे करत होता.. दादालाही ते पाहून कसं तरी होत होत पण गर्दी मुळे तो काहीच करु शकत नव्हता..ती मुलगी नाईलाजाने सर्व सहन करत उभी होती..मी तीच्यासोबत असलेल्या मुलाला आर.पी.एफ वाल्यांना बोलवायला सांगितल..पण तो बोला..”भया हमने टिकट नही निकाला. .वो हम को ही तकलीफ देगा..पहलेही पैसा नही है” अस बोलुन तो ही नाईलाजाने तिच रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता..डब्यातल कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हत..त्या पोरांचा घोळका तिची अता व्हिडिओ शुटींग करत होता.. ते पाहून त्या बैलाला आता चांगलच स्फुरण चढला होता त्याने हद्द पार करत काही वेगळाच करण्याचा प्रयत्न करु लागला..

ती मुलगी जोरात ओरडली आणि रडूच लागली..माझं मन ही तिच्या सोबत रडू लागलं..
गाडी ईगतपूरी ला पोहचली.. आणि गाडीत तृतीयपंथी ज्याला साधारण भाषेत हिजडा,किन्नर म्हणतो तो पैसे मागण्याकरीता आला.. एरवी हिजडा म्हणलं की प्रवाश्यांना पैसे मागुन लुटणारा नाही दिले तर शिव्या देऊन टाळ्या वाजवणारा अशी माझी समजुत..हिजड्याचं नाव ऐकल्यावर नाक मुरडणारे,किळसवाण्या नजरेने पाहणारे भरपुर प्रवासी मीही पाहीलेत..मी ही तसच करायचो..मला फार भिती वाटायंची त्यांची..

ईगतपुरीत ङब्यात आलेला हिजङा सर्वांना पैसे मागत मागत आमचा सिट पर्यंन्त आला..त्या हिजङ्याने त्या मुलीला रङताना पाहील..आणी तिला रङण्याच कारण विचारु लागला..हुंदके देत देत ती मुलगी तोङक्या मोङक्या हिंदीत त्या हिजङ्याला सर्व सांगु लागली..तिच्यासोबत असणारया मुलांने घङलेली सर्व हकिकत त्या हिजङ्याला सांगितली…त्या हिजङयाने एका मिनीटाचाही उशीर न करता कोण होता तो मुलगा त्या मुलीला विचारल…तिने बोट दाखवताच त्या हिजङ्याने त्या मुलाच्या थोबाङीत टेकवली…त्याचा हात पिरगळुन त्या पोराला तो हिजङा मारु लागला…घोळक्यातल्या पोरांची हिजङयाच ते रुप पाहुन चांगलीच फाटली होती..ङब्यातले माणस आता त्या हिजङ्याला त्या पोराना मारतानाचा व्हिङीओ घेऊ लागले..पण अजुनही मदतीला कोणी येत नव्हत..अता नाशिक आलच होत.
नाशिक ला येताच त्या मुलांच्या घोळक्याला हिजङ्याने खाली उतरावुन दिल…त्या मुलीने आणी तिच्यासोबतच्या मुलाने त्या हिजङयाचे आभार मानले…मुलगी अक्षरः त्या हिजङ्याच्या गळ्यात पङुन रङु लागली..हिजङयाने ही त्यांची विचारपुस केली..पैसे संपले होते म्हणुन त्या हिजङयाने त्यांना मदत म्हणुन पैसे देऊ केले..त्याने त्या हिजङ्याने प्रेमी युगुलाला चहा पाजुन धिर दिला..आणी ङब्यातुन उतरुन पुढच्या ङब्यात चालल्या गेला..पुढचा ङब्यात तो परत पैसे मागु लागला.
http://m.facebook.com/educationalsens
मनात सहज विचार आला..एक हिजङयांने त्या मुलांना थांबवल होत मी तर पुरूष होतो..दादा,ङब्यातले प्रवासी ही पण भरपुर पुरुष होते.पण कोणीच पुरुषार्थ दाखवु शकल नव्हत..बाईच्या शरिरावर पुरुषार्थ दाखवणारे पुरुष समाजात आपला पुरुषार्थ का दाखवत नाही..का मुलींना संकटात मदत करत नाही…हा प्रश्न मनात घर करुन गेला..

हिजङ्यांचा तिरस्कार करणारा मी मात्र.. त्या हिजङ्यांचा अभिमान बाळगु लागलो होतो..
माझा नजरेत मुलींची ईज्जतीवर हात टाकणारा तो मुलगा पुरुष हिजङा झाला होता आणी मुलीची ईज्जत वाचवणारा तो हिजङ्याचा #पुरुषार्थ मनाला भावला होता..

माणुस जे करु शकला नव्हता ते हिजङा म्हणजेच #अर्धनारीनटेश्वर करुन गेला होता..उगाच नाही देवाने सुध्दा अर्धनारीनटेश्वराचे रुप घेतल होत…
#संवैदनेची_शाळा #सामाजिक_संवैदनेची #सामाजिक_न्याय

अमरवेल ही एक "शांतिप्रिय" वाटणारी वेल आहे. ती ज्या झाडावर वाढते, त्याचं रस शोषून घेते... आणि हळूहळू संपूर्ण झाडाची ताकद ...
26/08/2025

अमरवेल ही एक "शांतिप्रिय" वाटणारी वेल आहे. ती ज्या झाडावर वाढते, त्याचं रस शोषून घेते... आणि हळूहळू संपूर्ण झाडाची ताकद संपवते. शेवटी ते झाड कोमेजून मरून जातं.

आपल्या आजूबाजूला पसरत चाललेल्या अशाच धार्मिक/धर्मांध, जातीयता "अमरवेली" पासून आपणही सावध राहायला हवं. दिसायला सुंदर वाटली तरी ही वेल शेवटी आपला नाश च करते.

⏳ वेळ निघून जाण्याआधी जागे व्हा... कारण उशीर झाल्यास आपलंसुद्धा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं!

#अमरवेल #सावधान

महाराष्ट्र राज्यभरात 1800 भजनी मंडळांना 25000 रूपये सरकार अनुदान भजन सामुग्री खरेदीसाठी...!1800×25000= 4,50,00,000शाळेती...
26/08/2025

महाराष्ट्र राज्यभरात 1800 भजनी मंडळांना 25000 रूपये सरकार अनुदान भजन सामुग्री खरेदीसाठी...!
1800×25000= 4,50,00,000
शाळेतील विद्यार्थ्यांचे काय..?

21/08/2025
एखाद्या मागासवर्गीय राजकीय नेत्यांनी, संघटनांनी कितीही खरं, वास्तव विचार मांडले तरीही बहुसंख्यांक जातींचे राजकीय पक्ष/ने...
19/08/2025

एखाद्या मागासवर्गीय राजकीय नेत्यांनी, संघटनांनी कितीही खरं, वास्तव विचार मांडले तरीही
बहुसंख्यांक जातींचे राजकीय पक्ष/नेते दखल घेत नाही, कारण; डोक्यातील जात+माज काही केल्या जात नाही.
वर बोंबलून म्हणता हे आमचे मत खाता म्हणजे मागासवर्गीय जनतेचे मते ह्यांच्या बापाची जाहगिरी आहे का..?
#बामसेफ #प्रकाश_अंबेडकर #संवैदनेची_शाळा

18/08/2025

बॅनरबाजी, देखावा करणारे काम करीत नाहीत.
हे त्रिकालाबाधित सत्य असतं.
फक्त
जनतेला उशिरा समजतं.

18/08/2025

स्वतःच्या जातीचा भिकार माज करून आणि मागासवर्गीय दलितांचा तिरस्कार करून कोणी मोठं होत नाही.
त्याआधी शिक्षणात मेहनत व संघर्ष करण्याची तयारी असावी लागते.

सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना :- विजय चोरमारे  #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर आणि  #राजर्षी_शाहू_मह...
18/08/2025

सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना :- विजय चोरमारे

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर आणि #राजर्षी_शाहू_महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत बाबासाहेबांनी कोल्हापूर संस्थानाला लवकरात लवकरात लवकर भेट द्यावी यासाठी महाराजांनी निमंत्रण दिले. बाबासाहेबांनीही कोल्हापूर भेटीचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले होते.

त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी कोल्हापुरातील स्नेही दत्तोबा पोवार यांना पत्र पाठवले आणि कोल्हापूरला येण्याची तारीख कळवली. महाराजांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. पोवार, त्यांचे मित्र गंगाधर पोळ आणि महाराजांचे खासगी सचिव कुंभोजकर यांनी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले. तेथून रेल्वेस्टेशनसमोरील महाराजांच्या रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे जुने शाहूपुरी पोलिस ठाणे येथे त्यांचे चहापान झाले. त्यानंतर कुंभोजकर यांनी त्यांना घोड्यांच्या रथातून नवीन राजवाड्यावर नेले. महाराजांनी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांचे स्वागत केले. या भेटीतच कोल्हापुरात बहिष्कृत वर्गाच्या लोकांची परिषद घेण्याचे ठरले. परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे डॉ. आंबेडकरांनी मान्य केले. (यातूनच साकारली ती ऐतिहासिक माणगाव परिषद.) कोल्हापूर संस्थानच्यावतीने बाबासाहेबांचा दोन दिवस पाहुणचार करण्यात आला. या दरम्यान महाराज चार घोड्यांच्या रथातून सोनतळी कॅम्पवरून रेस्ट हाउसवर आले. त्यांनी बाबासाहेबांना रथात घेऊन शहरांतून फेरफटका मारला. महाराजांच्या अशा प्रत्येक कृतीमागे हेतू असे. त्यामुळे बहुजन समाजात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले. परत जाताना त्यांनी सोनतळी कॅम्पवर भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. तेथे ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या या पहिल्या भेटीच्या शेवटी महाराजांनी रितीरिवाजानुसार बाबासाहेबांना जरीपटक्याचा आहेर केला आणि त्यांची शहरातून मिरवणूक काढली.

यावेळी बाबासाहेबांनी ‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला त्याचा सदैव मान राखीन…,’ असे भावोद्गार काढले. बाबासाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध घट्ट बांधले गेले. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिले.

ऐतिहासिक माणगाव परिषद हा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंधांचा महत्त्वाचा धागा आहे. दोन महान व्यक्तिमत्त्वे परस्परांचा किती आदर करतात आणि किती जिव्हाळ्याचे नाते जपतात हे तिथूनच दिसून आले. राजर्षी शाहू महाराजांनी समग्र दलित समाजाला, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हेच तुमचे खरे नेते असल्याची जाणीव माणगाव परिषदेच्या माध्यमातूनच करून दिली.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अवघे तीन-साडेतीन वर्षांचे आहेत. कारण दोघांचा परिचय झाल्यानंतर शाहू महाराजांना अधिक आयुष्य लाभले नाही. शाहू महाराजांचे देहावसान १९२२ मध्ये झाले. बाबासाहेब त्यानंतरही अनेक वर्षे जगले, परंतु त्यांच्या त्या प्रवासामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्याप्रती कृतज्ञता ओतप्रोत भरली आहे. शाहू महाराजांच्या नंतरही बाबासाहेबांचे कोल्हापूर संस्थानशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावर दिली जागा

बाबासाहेब कोर्टाचे काम किंवा इतर कामानिमित्त कोल्हापूरला आले की त्यांची पन्हाळ्याची भेट हमखास ठरलेली असे. पन्हाळ्यातील वातावरण त्यांना खूपच आवडे. छत्रपती राजाराम महाराजांनी ही बाब माहीत होती. बाबासाहेब आपल्या संस्थानात वारंवार यावेत आणि त्यांचे वास्तव्य आपल्या नगरीत असावे, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागाही दिली. त्यात विहीर खोदावी असा विचार बाबासाहेबांच्या मनात आला. काम सुरू केले. पण पाणी लागले नाही. त्यामुळे खोदाईचे काम थांबवण्यात आले.

कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची इच्छा

महानिर्वाणाआधी चार दिवस कोल्हापूरचे शामराव जाधव यांना नवी दिल्लीहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी कोल्हापूरची लोकसभा सर्वसाधारण जागेवरून लढवण्याची इच्छा आणि तयारी केली होती. शामराव जाधव यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवावी, असे या पत्रांत त्यांनी म्हटले होते. मात्र सहा डिसेंबर १९५६ ला त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचा कोल्हापूरशी जिव्हाळा होता, असे लक्षात येते.

बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात बिंदू चौकात उभारण्यात आला. शाहू विचारांचे कट्टर अनुयायी भाई माधवराव बागल यांनी तो उभारला आहे.

कोल्हापूरचे विद्यमान खासदार शाहू छत्रपती यांनी सरन्यायधीशांचे कोल्हापुरात आगमनप्रसंगी स्वागत केले. त्यावेळी सरन्यायधीशांनी आत्मीयतेने आणि प्रेमाने त्या स्वागताचा स्वीकार केला, महाराजांप्रती आदर व्यक्त केला. ते पाहिल्यानंतर त्यांच्या कोल्हापूरप्रती असलेल्या भावनांची कल्पना येते.

कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होत असताना या आठवणी विशेष महत्वाच्या आहेत. खंडपीठासाठीचा लढा चाळीस वर्षांचा आहे. अनेक सरन्यायाधीश, राज्यकर्ते आले नि गेले. परंतु सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यावर मोहोर उमटवली. त्यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सच्च्या अनुयायाने राजर्षी शाहू महाराजांना कृतज्ञतेने दिलेली ही कृतिशील मानवंदना म्हणावे लागेल. मोठ्या राजकीय निर्णयांना काही सामाजिक संदर्भही असतात. केवळ आपल्या नेत्यांचे फोटो लावून पोस्टरबाजी करणाऱ्यांना त्याची कल्पना येणार नाही.

तुम्हाला हलकं-फुलकं खायचंय की थोडं स्पेशल जेवण हवय? 🙂👉 काही पर्याय सांगतो :वरण भात लोणचं🍛🍚🍛 हलकं जेवण हवं असेल तरमूगडाळ ...
17/08/2025

तुम्हाला हलकं-फुलकं खायचंय की थोडं स्पेशल जेवण हवय? 🙂

👉 काही पर्याय सांगतो :

वरण भात लोणचं
🍛🍚
🍛 हलकं जेवण हवं असेल तर

मूगडाळ खिचडी + दही

पोहे/उपमा + चहा

भाज्यांचा सूप + टोस्ट

🍲 छान जेवण हवं असेल तर

वरण-भात + भजी/पापड

चपाती + भाजी (पालक, भेंडी, फ्लॉवर, इ.)

पुलाव + रायता

🍗 थोडं स्पेशल हवं असेल तर

पनीर बटर मसाला + नान

बिर्याणी + रायता

फिश करी/चिकन करी + भात

तुमचा मूड कसा आहे आज—हलकं, झटपट की स्पेशल?

 #नेत्रतज्ज्ञ_डॉ_तात्याराव_लहाने माझी माय अंजनाबाई जीने मला स्वत:ची  #किडनी देऊन दुसरा जन्म दिला. मी जन्मलो तेंव्हा मी म...
17/08/2025

#नेत्रतज्ज्ञ_डॉ_तात्याराव_लहाने

माझी माय अंजनाबाई जीने मला स्वत:ची #किडनी देऊन दुसरा जन्म दिला. मी जन्मलो तेंव्हा मी मायीच्या यातना पाहिल्या नव्हत्या.
पण मायाची किडनी काढताना तिला १६६ टाके घ्यावे लागले होते.
मायीच्या वेदना मी रोज पाहत होतो.
पण माय मात्र माझा तात्या वाचला पाहीजे एवढाच विचार करत होती. किती हा त्याग.१२ फेब्रुवारी १९९५ ला मायीचीकिडनी मला मॅच झाली. तो दिवस मी वाढदिवस म्हणुण साजरा करतो. पुढे २२ फेब्रुवारी ला आमची शस्त्रक्रिया झाली.
मला असं वाटत की आपण सर्वांनीच आई-वडिलावर प्रेम करायला पाहीजे. आपल्या सर्वांचे असेच प्रेम राहु द्या. फोटो जोडत आहे.

Address

Pune
411003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संवेदनेची शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share