Kartavya Sadhana - कर्तव्य साधना

Kartavya Sadhana - कर्तव्य साधना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील चिकित्सक लेखन प्रसिद्ध करणारे पोर्टल

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला व क्रीडा, साहित्य, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील लेख, मुलाखती, रिपोर्ताज व अन्य प्रकारांतील मजकूर लिखित किंवा चित्र, ऑडिओ/ व्हिडिओ स्वरूपात या पोर्टलवर असेल. शिवाय, आठवड्यातून एकदा इंग्लिश भाषेतील लेखन असेल.

कर्तव्यवर तुलनेने कमी शब्दसंख्येचे लेख व कमी वेळेचे व्हिडिओ राहतील. मात्र विश्लेषणात्मक व चिकित्सक मजकुराला/आशयाला अधिक पसंती दिली जाईल. भाष

ा अधिक सोपी, प्रवाही व किमान सभ्यता पाळणारी असावी याकडे लक्ष दिले जाईल. ताज्या विषयांना वा घडामोडींना प्राधान्य दिले जाईल. सम्यक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवत व भारतीय संविधानाला सुसंगत ठरतील अशा भूमिका घेत कर्तव्यची वाटचाल होत राहील.

बिहारची आशा आणि समाजवादाचा आशाबिंदूआगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी प्रसाद यादव यांचे आव्हानतेजस्वींची शैली लालूप्...
10/09/2025

बिहारची आशा आणि समाजवादाचा आशाबिंदू

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी प्रसाद यादव यांचे आव्हान

तेजस्वींची शैली लालूप्रसाद यादवांच्या परंपरेतून आलेली असली तरी त्यात स्वतःची नवी झलक दिसते. ते धर्मांधतेला उघडपणे आव्हान देतात आणि सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि बिहारी अस्मिता यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या सभांना युवक वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि बिहारच्या राजकीय पटावर त्यांच्या नेतृत्वाचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवते.
- केतनकुमार पाटील

Link :
https://www.kartavyasadhana.in/view-article/ketankumar-patil-on-tejaswi-yadav

INDIA आघाडीत तेजस्वी यादव यांची प्रतिमा एक विश्वासार्ह व ठाम नेते म्हणून उभी राहिली आ...

पुनर्भेट विल ड्यूरांट चा प्रयोग... विनोद शिरसाठ जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) अन्य दोन संघटनांच्या सहकार्याने 2003 पासू...
10/09/2025

पुनर्भेट

विल ड्यूरांट चा प्रयोग... विनोद शिरसाठ

जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) अन्य दोन संघटनांच्या सहकार्याने 2003 पासून 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आज 10 सप्टेंबर 2025, या निमित्ताने साधना साप्ताहिकात 2018 च्या युवा दिवाळी अंकात प्रकाशित झालेला एक लेख पुनर्भेट म्हणून पाठवत आहोत. हा लेख अमेरिकन तत्वज्ञ विल ड्यूरांट यांनी केलेल्या एका अफलातून प्रयोगावर आणि त्या प्रयोगाची हकिगत सांगणाऱ्या The Meaning of Life या कमालीच्या रोचक पुस्तकावर आधारित आहे. हा लेख वाचून झाल्यावर जिज्ञासू वाचकांनी मूळ इंग्रजी पुस्तक वाचावे.

लिंक : https://weeklysadhana.in/view_article/vinod-shirsath-on-will-durant-question-about-meaning-of-life

#साधना #साधनासाप्ताहिक

साधना प्रकाशनाचे पुस्तक त्रिकोणी साहस - प्रगती पाटील या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्य...
09/09/2025

साधना प्रकाशनाचे पुस्तक

त्रिकोणी साहस
- प्रगती पाटील

या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'श्वेतालिया' नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर 'साहस श्वेतम' नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो...

संपर्क : साधना प्रकाशन
431 शनिवार पेठ, पुणे 30
Ph. 020 24459635/ Mob. 7058286753
[email protected]
Web : https://sadhanaprakashan.in/

#मराठी #साधनाप्रकाशन #साधनाबुक्स #प्रगतीपाटील #साधना

प्रिय वाचकहो साधना साप्ताहिकाचे ऑगस्ट महिन्याचे चारही छापील अंक वर्गणीदार वाचकांना त्या त्या आठवड्यात पोस्टाद्वारे पाठवल...
07/09/2025

प्रिय वाचकहो

साधना साप्ताहिकाचे ऑगस्ट महिन्याचे चारही छापील अंक वर्गणीदार वाचकांना त्या त्या आठवड्यात पोस्टाद्वारे पाठवले आहेत. वेबसाइटवरही आले आहेत. त्यामध्ये "भूमिका" या वैचारिक नाटकावरील विशेषांक आहे आणि दोन मिनी विशेषांकही आहेत. त्या चार अंकांत मिळून 26 लेख आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक लेख कोणत्याही चांगल्या वाचकाला वाचायला निश्चित आवडतील. अर्थातच, प्रत्येकाचे 'अर्ध्याहून अधिक' वेगळे असतील. मात्र त्यातील नरेश दधीच आणि अतीश दाभोलकर या दोन भौतिक शास्त्रज्ञांचे प्रत्येकी बारा पानांचे लेख युनिक आहेत.

छापील अंकात वाचायचे राहून गेले असतील किंवा अंक आलाच नसेल तर weeklysadhana.in या वेबसाईटवर वाचता येतील. मात्र हेही खरे की, असे दीर्घ व वैचारिक लेख छापील अंकात वाचण्याचा अनुभव आणि आनंद वेगळा आहे. त्यामुळे, साधनाचे वर्गणीदार व्हा. त्यासाठी साधना कार्यालयाशी फोन, मेल, मेसेज द्वारे संपर्क साधा.!
... साधना साप्ताहिक
431, शनिवार पेठ, पुणे 411030
Ph 02024451724
Mob 7028257757
[email protected]

साधना साप्ताहिक : 13 सप्टेंबर 2025संपादकीय तुंबलेल्या पाण्याने वाट काढली! जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव आणि त्...
05/09/2025

साधना साप्ताहिक : 13 सप्टेंबर 2025

संपादकीय

तुंबलेल्या पाण्याने वाट काढली!

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव आणि त्या गावातील मनोज जरांगे हा तरुण नेता उभ्या महाराष्ट्राला 1 सप्टेंबर 2023 रोजी माहीत झाला. त्याआधी पंधरा वर्षे तो नेता मराठा आरक्षणासाठी लढत असला तरी, जालना जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विशिष्ट परिसरापुरता माहीत होता. पण त्या छोट्या गावात मराठा आरक्षण मागणीसाठी त्या नेत्याने आरंभलेले ते उपोषण आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी तेव्हा जो लाठीमार केला, त्याची दृश्ये दूरचित्रवाहिन्यांवर लोकांनी पाहिली, तेव्हा महाराष्ट्रात प्रक्षोभ झाला. एका रात्रीत तो नेता आणि ते गाव महाराष्ट्रात लहान-थोरांच्या ओठांवर रुळले. अर्थातच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट वा अस्पष्ट आदेशानुसार पोलिसांनी तो हल्ला केला, तेव्हापासून ते आंदोलन पेटत राहिले आणि आता ‌‘उभ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा सर्वोच्च नेता‌’ म्हणून मनोज जरांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मागील दोन वर्षांत त्यांनी आधी उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांना खलनायकाच्या प्रतिमेत रंगवले. देवेंद्र यांच्यावर इतका उघड, इतका प्रखर व शिवराळ हल्ला त्यांच्या दीड-दोन दशकांच्या कारकिर्दीत कोणीच केला नव्हता.

तसे पाहता, मराठा आरक्षण ही मागणी एक-दीड दशकापासून चढत्या क्रमाने वाढत गेली आहे. या काळातील सर्व राज्य सरकारांनी त्या बाबतीत ‌‘अवघड जागेचे दुखणे व उपाय नाही‌’ अशा पद्धतीने नांगी टाकली. 2016 मध्ये झालेले मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूक मोर्चे अभूतपूर्व ठरले. त्या आधी आणि नंतरही आलेले सर्व मुख्यमंत्री आपापल्या पद्धतीने मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांपैकी कोणालाच आत्मविश्वास नव्हता. मागासवर्गीय आयोग नेमले गेले, मराठा समाजाचे शैक्षणिक मागासलेपण दाखवणारे सर्व्हे केले गेले, मंत्रीमंडळ उपसमित्या झाल्या. विधानसभेत कायदा मंजूर करून झाला, उच्च न्यायालयांमधून तो सहीसलामत सोडता आला, पण सर्वोच्च न्यायालयाने तो अवैध ठरवला. अन्य सर्व उपाय योजूनही पुन्हा तसेच होणार हेही उघड होत गेले. त्यामुळे, घटनादुरुस्ती करून एकूण आरक्षणावर असलेली 50 टक्क्यांची मर्यादा उठवणे हाच एकमेव व अंतिम पर्याय उरला, यावर सर्वांचे उघड वा मनोमन एकमत झाले. आणि ते घडायचे तर केंद्र सरकारच्या कोर्टात तो चेंडू जातोय, आणि त्यांना ते करायचे असेल तर देशातील अन्य समाज घटकांच्या अशाच मागण्या मान्य कराव्या लागतील, त्यातून नवेच आग्या मोहोळ उठणार हेही सर्वांस दिसत होते. त्यामुळे, एक प्रकारची नाउमेद निर्माण होऊ लागली होती. मराठा आरक्षण मागणीला घरघर लागली आणि मराठा समाजासाठी ‌‘सारथी‌’ सारखी संस्था किंवा अन्य महामंडळे या दिशेने रचनात्मक वाटचाल सुरू झाली होती.

नेमके याच टप्प्यावर जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीवर प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळाच मार्ग अवलंबला. तो मार्ग आधी क्षीण आवाजात उच्चारला, पण नंतर तोच मुख्य सूर बनला. तो मार्ग म्हणजे ‌‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे‌’ अशी मागणी. प्रथमदर्शनी ती मागणी सर्वांनीच वेड्यात काढली. कारणे तीन- एक, मराठा समाज संख्येने तीस ते चाळीस टक्के असेल आणि ओबीसीमध्ये अगोदरच पन्नास टक्के लोक असतील तर 27 टक्के ओबीसी कोट्यातून मराठा समाजाच्या वाट्याला येणार तरी किती? दुसरे कारण, मुळात तसा निर्णय झाला तर ओबीसी तो मान्य करतील का? तिसरे, मराठा समाजाला ओबीसी ठरवता येणे शक्य तरी आहे का आणि ते घटनात्मक दृष्टीने मान्य होणे तरी शक्य आहे का? त्यामुळे मागील दशकभर जो उठतो तो ‌‘आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे‌’ असे म्हणतो. त्यात ‌‘आरक्षण मिळावे‌’ असे म्हणणारे आहेत, ‌‘आरक्षण मिळेलच‌’ असे म्हणणारे आहेत, ‌‘मराठा समाजाला ते मिळावे‌’ अशी इच्छा नसणारे आहेत आणि ‌‘आरक्षण मिळणार नाही‌’ ही खात्री मनोमन असणारेही आहेत. एकूण प्रकार एका बाजूला भाबडेपणा आणि दुसऱ्या बाजूला दांभिकपणा होता.

अशा पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी खुश्कीचा मार्ग शोधला. मराठा समाजाअंतर्गत असलेल्या कुणबी या उपजातीला पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे, तर सर्व मराठा समाज कुणबी ठरवावा. म्हणजे आपोआप ओबीसीमधून आरक्षण मिळेल. पण तसे करायचे ठरले तर पुरावे पाहिजेत. म्हणून हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट व तत्सम पुरावे मिळवावेत अशी मागणी सुरू झाली. ते पुरावे ठोस मिळणार नाहीत तर मग थोडा धागा दिसला तरी आप्तस्वकीय व त्या गावातील लोकांना ते आरक्षण मिळेल हा मार्ग सुचवला गेला. सुरुवातीला तो पर्याय अगदीच तकलादू वाटला, त्यातून कितपत साध्य होईल असे वाटले. पण बघता बघता त्या पर्यायामध्ये भलतीच ताकद आहे असे लक्षात आले. मग ‌‘मराठा समाजाचे आरक्षण‌’ ही मागणी, ‌‘करून टाका सर्वांना कुणबी‌’ या मागणीत रूपांतरित झाली. तसे करायचे तर कागदोपत्री पुरावे गोळा करा किंवा निर्माण करा किंवा आहेतच असे दाखवा. जरांगे यांच्या या खुश्कीच्या मार्गाला महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून विशेषतः मराठवाड्यातून भलताच पाठिंबा मिळत गेला. मागील दोन वर्षांच्या आंदोलनातून तशा 16 लाख नोंदी सापडल्या. म्हणजे तेवढ्या कुटुंबांना त्याचा फायदा होणार असे दिसू लागले. परिणामी, अशा नोंदी आणखी सापडल्या तर आपणाला आरक्षण मिळू शकते, अशी आशा अनेकांच्या दृष्टिपथात येत गेली. मात्र, या प्रक्रियेत ओबीसी-मराठा यांच्यात संघर्ष सुरू झाला. ओबीसीचे नेतृत्व आपोआप छगन भुजबळ यांच्याकडे आले. त्यामुळे मागील दोन वर्षांत जरांगे व भुजबळ हे दोघेही आपापल्या समाजाचे आरक्षण मसीहा ठरले.

अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर बरोबर दोन वर्षांनी मुंबईमध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 या काळात आंदोलन झाले. ते अभूतपूर्व होते. ऐन गणेश उत्सवाच्या धामधुमीमध्ये काही लाख लोक राज्याच्या कानाकोपऱ्यांतून मुंबईत दाखल झाले. अर्थात, त्यात मराठवाड्यातून आलेल्यांचे प्राबल्य होते. त्या गर्दीमध्ये सर्वसामान्य गरीब मराठा समाज दिसत होता आणि त्यांना पाठिंबा देणारा व रसद पुरवणारा श्रीमंत मराठा समाज परिघावर उभा होता. तर सर्व राजकीय पक्षांच्या मराठा नेत्यांचा आतून पाठिंबा असल्याचेही ढोबळ चित्र दिसले. दीड वर्षांपूर्वी असेच आंदोलन मुंबईमध्ये झाले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते सहजतेने गुंडाळल्याचे दिसले होते. तेव्हा मराठा समाजाच्या हाती फारच थोडे लागले असे मानले गेले. आताचे आंदोलनही तसेच गुंडाळले जाईल असा अनेकांचा कयास होता. त्यामुळे राज्य सरकारने तरी पूर्वतयारी केली नव्हती. उलट मराठवाड्यातून इतक्या दूरवरून येणारी आंदोलक माणसे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छतागृह यांची टंचाई निर्माण झाली तर फार वेळ तग धरणार नाहीत आणि आपापल्या गावाची वाट धरतील, असा सरकारचा समज होता. त्यामुळे सरकारने आणि मुंबई महापालिकेने सुविधा देणे तर दूरच, पाणी, अन्न, स्वच्छतागृह, वीज यांचा तुटवडा निर्माण होईल अशी व्यवस्था केली. मात्र, पहिल्याच दिवशी आंदोलकांची झालेली परवड पाहून महाराष्ट्रातून सहानुभूतीची लाट आली. सरकारविषयीचा रोष म्हणून आंदोलकांना रसद पुरवण्यासाठी चढाओढ लागली. मराठवाड्यातून घराघरांतून तयार भाकरी मुंबईला येऊ लागल्या. त्यामुळे आंदोलनाचा जोर आणखी वाढला. सरकारने नमते घेतले, पण आंदोलनाचा जोर वाढतच राहिला. आंदोलन चिघळले तर काय असा प्रश्न निर्माण झाला. चौथ्या-पाचव्या दिवशी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. सरकार व आंदोलक यांना दटावले. परिणामी, आंदोलन संपवण्यासाठी तोडगा काढला गेला आणि दोन्ही बाजूंनी ‌‘विन विन‌’चा जयघोष झाला.

त्यानंतर ‌‘मराठा समाजाला फार काही मिळाले नाही‌’ ही चर्चा एका बाजूला, ‌‘ओबीसीचा वाटा कमी झाला‌’ ही चर्चा दुसऱ्या बाजूला, ‌‘आंदोलनाचा दबाव व मराठवाड्याचे कुप्रशासन पाहता कुणबी प्रमाणपत्रात खूप गैरप्रकार होतील‌’ ही चर्चा तिसऱ्या बाजूला. आणि ‌‘खूप जास्त प्रमाणपत्रे वाटप केली तरी ती वैध ठरणार नाहीत‌’ ही चर्चा चौथ्या बाजूला चालू आहे. ती चर्चा यापुढेही होत राहील. चारही शक्यता कमी-अधिक फरकाने खऱ्याच ठरतील. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे यशापयश तेवढ्याच निकषावर मोजता येणार नाही. त्यांनी गेल्या दोन वर्षांत सातत्याने आडमुठेपणा दाखवला असे दिसते, पण आता त्यामधून गावरान शहाणपण दिसते आहे. त्यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा येरागबाळ्यांचा व भोळ्या भाबड्या जनतेचा आहे, असा एक समज अनेकांनी बाळगला. पण त्यात नियोजनबद्धता होती, हे आता सिद्ध झाले आहे. नेता व अनुयायी अडेलतट्टू आहेत, असे अनेकांना वाटत होते; पण कुठपर्यंत ताणायचे हे त्यांना चांगलेच कळते, हेही सिद्ध झाले. त्यांच्या बोलण्यातला शिवराळपणा व वागण्यातला बेधडकपणा लोकांनी स्वीकारला किंवा क्षम्य मानला. नेत्याकडे व्यक्तिगत प्रामाणिकपणा आणि टोकाचा त्याग करायची तयारी असेल, तर जनतेचा पाठिंबा अतिरिक्त प्रमाणात मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मग त्यांच्या विरोधात कारस्थाने करायला, फितुरी व फोडाफोडी करायला मर्यादा पडतात हेही उघड झाले. या सर्वांचा एकत्रित परिणाम, ‌‘मराठा समाजाचा मराठवाड्यातील तारणहार‌’ ही प्रतिमा जरांगे यांची उभी राहिली आहे.

या आंदोलनाचा खरा फायदा काय हे लक्षात घेतले तर यशापयश वेगळ्या पद्धतीने मोजता येईल. मुळात मराठवाड्याच्या वाट्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपण पूर्वापार आहेच. हैदराबाद संस्थानामध्ये काही शतके राहावे लागल्याने आणि ब्रिटिश राजवटीचे उर्वरित भारताला मिळाले ते फायदे न मिळाल्याने ते मागासलेपण आहे, हे एक कारण. तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती, उद्योग, व्यापार व सेवा या चारही क्षेत्रांतील विकासाला आणि साहजिकच त्यातून मिळणाऱ्या रोजगाराला मर्यादा पडल्या, हे दुसरे कारण. उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांकडून सतत अवहेलनेची व सापत्न भावाची वागणूक मिळत राहणे आणि त्यांनी मराठवाड्याच्या वाट्याचे पळवत राहणे हे सतत व सर्रास घडत आले, हे तिसरे कारण. त्यामुळे मराठवाड्यात सरकारी नोकरीचे भलतेच आकर्षण. अर्थातच, रुबाब दाखवता येणे, कमी कष्टांत जास्त मोबदला मिळत राहणे, अकार्यक्षमतेला जाब विचारता न येणे हे सरकारी नोकरीचे अवगुण विशेष सर्वत्र आहेत, मराठवाड्यात ते प्रमाण तुलनेने जास्त. जरांगे यांच्या आंदोलन पद्धतीला अवघ्या दोन वर्षांत इतके डोक्यावर घेतले गेले ते यामुळेच!

मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून हाती काय लागले हा प्रश्न तिथल्या जनतेला सध्या तरी पडणार नाही. मराठवाड्याने मुंबईला वाकवले, झुकवले, राज्य सरकारला हात टेकायला लावले, हे तेथील जनतेला परमसुखाची अनुभूती देणारे आहे. आताचे उपोषण सोडताना जरांगे म्हणाले, “मागील 75 वर्षांत असा विजय झाला नाही.” त्यांचे ते शब्द अनेकांना अतिशयोक्ती वाटले. शब्दशः विचार केला तर ती अतिशयोक्ती आहेच. पण त्याचा भावार्थ लक्षात घेतला तर वेगळे चित्र दिसेल? म्हणजे 75 वर्षांपूर्वी मराठवाडा प्रदेश निजामाच्या तावडीतून सुटून महाराष्ट्राशी जोडला गेला, त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना मराठवाड्याने असे व इतके झुकवल्याचे उदाहरण सापडणार नाही. तो विचार केला तर जरांगे बोलले ते खरे आहे!

आताच्या आंदोलनात मुंबईतील ती गर्दी, तो जल्लोष, ती गाणी बजावणी, ते खेळणे, ती हडेलहप्पी, ती शिवराळ वक्तव्ये, जरांगेंविषयीचा भक्तिभाव, फडणवीसांचा द्वेष, अन्य नेत्यांबाबत तुच्छता, स्वतःच्या हक्कांबद्दलचा टोकाचा आग्रह, ‌‘मिळवणारच‌’ अशा राणा भीमदेवी घोषणा - या सर्वांकडे दीर्घकाळ साचून राहिलेली खदखद बाहेर पडत आहे, असे पाहिले तर? अर्थातच, या आंदोलनाचे विश्लेषण झुंडीच्या मानसशास्त्राप्रमाणे निश्चित करता येईल. मात्र या झुंडी नियंत्रित होत्या, खूप अन्याय व उपेक्षा सहन करत आल्यावर निर्माण झालेल्या होत्या. त्यांच्यात द्वेष आणि वैरभाव मूलतः नाही. साचलेल्या व तुंबलेल्या पाण्याला योग्य वेळी व योग्य पद्धतीची वाट काढून दिली नाही, तर ते पाणी आपली अशी वाट काढते. ती अर्थातच सरळ नसते, वाकडीतिकडी असते. जरांगे यांच्या आंदोलनांमध्ये तसेच झाले. त्यामुळे ‌‘तुंबलेल्या पाण्याने काढलेली वाट‌’ असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यात सूत्र, तत्त्व, नियम शोधता येणे अवघड आहे. पारंपरिक व सैद्धांतिक निकष लावून त्याचे यशापयश मोजणे निष्फळ ठरेल. त्यामुळे, तुंबलेल्या पाण्याने वाट काढल्यावर त्या पाण्याचे पुढे काय होणार हे सांगता येणार नाही. काही शक्यता व्यक्त करता येतील, पण शक्यताच! त्या संदर्भात पुढील अंकात...

( साधना साप्ताहिकाचा हा अंक येत्या सोमवारी म्हणजे 8 सप्टेंबरला छापून येईल, त्याच दिवशी तो वर्गणीदार वाचकांना रवाना होईल.)

#साधना #साधनासाप्ताहिक #आरक्षण

प्रकाशन समारंभ1976 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे हे आत्मकथन 'पॉप्युलर प्रकाशन' मुंबई यांनी प्रकाशित केले होते. त्या प...
03/09/2025

प्रकाशन समारंभ

1976 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे हे आत्मकथन 'पॉप्युलर प्रकाशन' मुंबई यांनी प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. पहिल्या आवृत्तीला पी. व्ही. नरसिंहराव यांची प्रस्तावना होती, दुसऱ्या आवृत्तीला न.गो. राजूरकर यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.

संन्याशाच्या डायरीतून (हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी)
- स्वामी रामानन्द तीर्थ
अनुवाद : वि. पां. देऊळगावकर

हस्ते : निशिकांत भालेराव
प्रमुख पाहुणे : कौस्तुभ दिवेगावकर
अध्यक्ष : डॉ. सुरेश खुरसाळे

स्थळ :
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे, गोविंदभाई श्रॉफ सभागृह, छत्रपती संभाजीनगर
वेळ :
रविवार 14 सप्टेंबर 2025, सकाळी 11 वाजता

संयोजक :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था (छत्रपती संभाजी नगर)
आणि साधना प्रकाशन (पुणे)

संपर्क साधना प्रकाशन
431, शनिवार पेठ, पुणे 30
Ph. 020 24459635/Mob. 7058286753
[email protected]

साधना साप्ताहिकाचा बालकुमार आणि युवा दिवाळी अंक 2025आजच नोंदणी करा..नोंदणी करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025प्रकल्प ...
01/09/2025

साधना साप्ताहिकाचा बालकुमार आणि युवा दिवाळी अंक 2025

आजच नोंदणी करा..
नोंदणी करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025

प्रकल्प व्यवस्थापक
गोपाल नेवे : 9421702841
Ph: 020-24451724,
Mob: +91 70282 57757


आज 26 ऑगस्ट : ग. प्र. प्रधान यांच्या जन्मदिवसानिमित्त विनम्र अभिवादन..संपर्क : साधना प्रकाशन431 शनिवार पेठ, पुणे 30Ph. 0...
26/08/2025

आज 26 ऑगस्ट : ग. प्र. प्रधान यांच्या जन्मदिवसानिमित्त विनम्र अभिवादन..

संपर्क : साधना प्रकाशन
431 शनिवार पेठ, पुणे 30
Ph. 020 24459635/ Mob. 7058286753
[email protected]
Web : https://sadhanaprakashan.in/

#मराठी #साधनाप्रकाशन #साधनाबुक्स #गप्रप्रधान #साधना

संवेदनशीलतेतून परिवर्तन घडवून आणण्याचा कृतीशील उत्सवसहावा राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह : 15 ते 21 ऑगस्ट 2025मागील नऊ दशकां...
22/08/2025

संवेदनशीलतेतून परिवर्तन घडवून आणण्याचा कृतीशील उत्सव
सहावा राष्ट्रीय समाजकार्य सप्ताह : 15 ते 21 ऑगस्ट 2025

मागील नऊ दशकांपासून भारतात व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाचा प्रवास अविरतपणे सुरू असूनदेखील, समाजकार्य 'व्यवसायाची' ओळख आजही अनेकांच्या तोंडवळणी पडलेली नाही. सामान्य लोकांकडून समाजकार्याच्या व्यवसायिक क्षेत्राविषयी नेहमीच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अनेक संवेदनशील लोक प्रशिक्षण न घेताही उत्तम समाजकार्य करतात, मग समाजकार्य करण्यासाठी वेगळ्या शिक्षण-प्रशिक्षणाची गरज काय?
- सुधीर मस्के

Link :
https://www.kartavyasadhana.in/view-article/sudhir-maske-on-social-work-week

एक पुनर्भेट अशीही...डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे चित्र म्हणजे प्रत्यक्षात काढलेल्या रांगोळीचा फोटो आहे. ही रांगोळी काढली...
20/08/2025

एक पुनर्भेट अशीही...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे चित्र म्हणजे प्रत्यक्षात काढलेल्या रांगोळीचा फोटो आहे. ही रांगोळी काढली गेली 2018 मध्ये, पुणे येथील सानिया कर्णिक नावाच्या मुलीने. अकरावीत असताना तिने रांगोळीचा क्लास लावला होता. त्या क्लासमध्ये, शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचे रांगोळी चित्र काढायला सांगितले होते, तेव्हा सानियाने सात आठ तास बैठक मारुन ही पोर्ट्रेट रांगोळी काढली होती.

नंतर सानियाने मुंबई विद्यापीठातून चिनी भाषेचे पदवी शिक्षण घेतले आणि मागील दोन वर्षांपासून ती चीन मधील बीजिंग विद्यापीठात चिनी भाषेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. "वसुधैव कुटुंबकम ( चीनमध्ये ) अनुभवताना" हा तिचा दीर्घ लेख गेल्या वर्षीच्या साधना युवा दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा म्हणून प्रसिद्ध केला होता आणि बीजिंग विद्यापीठात भेटलेल्या चार खंडांतील चार मैत्रिणींवर लिहिलेला तिचा लेख साधनाच्या मुख्य दिवाळी अंकात प्रसिद्ध केला होता. जानेवारी 2025 मध्ये ती भारतात आली, तेव्हा युवक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दोन युवतींचा संवाद या कार्यक्रमात अभिनेत्री गौरी देशपांडे आणि सानिया कर्णिक यांनी परस्परांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा व्हिडिओही साधना साप्ताहिकाच्या यू ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

आज 20 ऑगस्ट 2025, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 12 वा स्मृतिदिन. त्या निमित्ताने सात वर्षांपूर्वीची ते रांगोळी चित्र आणि त्यासोबत ते दोन लेख आणि एक व्हिडिओ , हा सर्व ऐवज पुनर्भेटीला आणत आहोत.
.... संपादक, साधना साप्ताहिक

वसुधैव कुटुंबकम ( चीनमध्ये ) अनुभवताना https://share.google/07bUvVLL1YZkCoVDo

चार खंडांतील चार मैत्रिणी https://share.google/pwiGNAd60fH9xaWEK

सानियाची गौरी ने घेतलेली मुलाखत
https://youtu.be/oSYEEykXZ5Q?si=X3csu-_CQmB-fBy1

गौरी ची सानियाने घेतलेली मुलाखत
https://youtu.be/CKcJmd1vVZw?si=Joy6RxD85ETBafd4

आज 20 ऑगस्ट 2025 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..डॉ. दाभोलकर यांचे साधना डिजिटल...
20/08/2025

आज 20 ऑगस्ट 2025 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
डॉ. दाभोलकर यांचे साधना डिजिटल अर्काईव्ह मधील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या..
Link : https://shorturl.at/Ent45

#मराठी #नरेंद्रदाभोलकर #साधनासाप्ताहिक

भूमिका नाटकाची विशेष दखल घेणारा अंकसाधनाचा 78 वा वर्धापन दिन विशेषांक15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक...
19/08/2025

भूमिका नाटकाची विशेष दखल घेणारा अंक
साधनाचा 78 वा वर्धापन दिन विशेषांक

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. स्वातंत्र्यदिन आणि वर्धापनदिनाच्या निमित्ताने साधनाचा विशेषांक नियमितपणे प्रसिद्ध होतो.

यंदाचा 78 वा वर्धापन दिन विशेषांक 'भूमिका' या सामाजिक-वैचारिक नाटकावर आधारित आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट 2025 ला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात रात्री 9:30 वाजता भूमिका नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाच्या वेळी झाले. त्या अंकाचा परिचय करून देणारा हा लेख

Link :
https://www.kartavyasadhana.in/view-article/rucha-mulay-on-bhumika-visheshank

कलाकारांनी समाजातल्या महत्त्वाच्या विषयांवर भूमिका घेण्याची गरज, आजच्या अस्थिर काळात असे व...

Address

Shaniwar Peth

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6pm

Telephone

+912024451725

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kartavya Sadhana - कर्तव्य साधना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kartavya Sadhana - कर्तव्य साधना:

Share