MH 13 NEWS

MH 13 NEWS सोलापूरकरांच्या हक्काचं

https://www.youtube.com/c/MH13NEWS

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्तविशेष एनआयए न्यायालयाचा निकाल; “संशयावर शिक्षा करता येत नाही” - न्...
31/07/2025

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल; “संशयावर शिक्षा करता येत नाही” - न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

मुंबई : 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने आज निकाल दिला. तब्बल १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले असून, “फक्त संशयाच्या आधारे कोणालाही शिक्षा करता येत नाही,” असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

या स्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर आरोपींवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने सर्व पुरावे तपासून घेतल्यानंतर हे आरोप टिकू शकले नाहीत, असे स्पष्ट केले.

न्यायालयाने नमूद केले की,

कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांची असल्याचे सिद्ध होत नाही.

पंचनामा प्रक्रियेत त्रुटी होत्या; बाईकचा चेसिस नंबर नीटपणे नमूद केलेला नव्हता.

आरोपींनी कट रचल्याचा आणि त्यासाठी बैठक घेतल्याचा कोणताही ठोस पुरावा न्यायालयाच्या नजरेस पडलेला नाही.

मोबाईल किंवा आर्थिक व्यवहारांमधूनही कोणतेही ठोस पुरावे सादर झाले नाहीत.

29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात मालेगावमधील भीकू चौकाजवळ एका बाईकवर स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडवली होती.

शिंदे गटाला सोलापुरात जबरदस्त झटका!जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा धक्कादायक राजीनामा; पदाधिकाऱ्यांच्या मनमानीने ना...
31/07/2025

शिंदे गटाला सोलापुरात जबरदस्त झटका!
जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा धक्कादायक राजीनामा; पदाधिकाऱ्यांच्या मनमानीने नाराज

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपला राजीनामा थेट शिंदे यांच्याकडे सादर करत धक्का दिला आहे.

राजीनामा पत्रात सावंत यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. “सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड मला विचारात न घेता केली गेली. माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष व शहरप्रमुख यांचीही निवड परस्पर झाली, हे पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नाही हेच दर्शवते,” असे त्यांनी नमूद केले आहे.

हा राजीनामा सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटासाठी खळबळजनक ठरला असून, येत्या काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर*      गुरुवार दि- ३१, जुलै २०२५        *🌹काकडा आरती🌹*            *🌸न...
31/07/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर*
गुरुवार दि- ३१, जुलै २०२५
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

सोलापूर महापालिकेत विशेष गरजांच्या ३५७ विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिर यशस्वीराष्ट्रीय शैक्षणिक धोरणास ५ वर्ष प...
31/07/2025

सोलापूर महापालिकेत विशेष गरजांच्या ३५७ विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिर यशस्वी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास ५ वर्ष पूर्ण - ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ अंतर्गत उपक्रम...

ष्ट्रीय शैक्षणिक धोरणास 5 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण 357 विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30 जुलै 2025 रोजी मनपा मुलांची उर्दू केंद्र शाळा कॅम्प सोलापूर या ठिकाणी दृष्टी मूल्यमापन शिबिर संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त श्री तैमूर मुलाणी यांनी केले.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, श्री गिरीश पंडित,प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, श्री विठ्ठल ढेपे, एच व्ही देसाई हॉस्पिटल चे असोसिएट डायरेक्टर डॉ. श्री. सुधीर सुदाल , डॉ. व्ही.एम.स्मृती शासकीय मेडिकल कॉलेज , सोलापूर येथील डॉ. निलेश बागुल व त्यांचे सहकारी नेत्ररोग विभागातील वैद्यकीय तज्ञ, शाळेच्या मुख्याध्यापिका ,तबसुम शेख , पर्यवेक्षक श्री भगवान मुंढे, श्रीमती नीलोफर सय्यद ,श्री.संतोष बुलबुले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.आयुक्त,डॉ.सचिन ओम्बासे यांनी समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमान्वये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी दृष्टी मूल्यमापन करून त्यांच्या गरजेनुरूप विविध प्रकारातील सेवा, पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

ज्यामध्ये शस्त्रक्रिया ,चष्मे, या सेवा एच.व्ही.देसाई हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत स्वरूपात पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर लोविजन कीट, दिव्यांग प्रमाणपत्र, ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तके इत्यादी सेवा समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पुरविल्या जाणार आहेत. ज्या मुलांना चष्म्याची शिफारस झाली आहे ,अशा मुलांनी चष्मे प्राप्त झाल्यानंतर त्याचा नियमितपणे वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. चष्मा वापरण्याची लाज बाळगण्याची गरज नाही असे देखील नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्या रोटे, विशेष शिक्षिका यांनी केले. तर उपस्थित विद्यार्थी पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार श्री.अविनाश शिंदे, समन्वयक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांनी परिश्रम घेतले.

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू                         मंत्री मंगल प्रभात लोढाम...
30/07/2025

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू
मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ३० : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी अनसूचित जातीतील व नवबौध्द घटकातील प्रशिक्षणार्थ्यींचे सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीसाठी चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात दिली आहे. या संस्थेत सन २०२५-२६ साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयन, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आय. ओ. टी. टेक्निशियन (स्मार्ट सिटी), इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देवून जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ तयार करणे हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे. आय.टी.आय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील ३६ जिल्हास्तरीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या सहायाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृध्दींगत करणे, राज्यात दरवर्षी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

आय.टी.आय मध्ये नविन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग जगताला आवश्यक असे अधिक मागणीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

 #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर!विद्यापीठ...
30/07/2025

#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर!

विद्यापीठास 21 वर्षे पूर्ण; शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती मंगलताई शहा या ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पालवी संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलताई शहा यांच्याकडून होत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठाचा 21 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. महानवर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आमदार श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. या ही पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर.
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
4)उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन: डॉ. शिरीष शामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
6)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार: नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
7)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय): राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब
8)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.

जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मंगलताईंविषयी...
एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात. मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचा असा विश्वास आहे की, जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

Solapur Universitry Solapur

🛣️ महाड-रायगड महामार्गाचे “छत्रपती महामार्ग” असे नामकरण होणार – छत्रपती संभाजीराजेंची माहितीनवी दिल्ली | प्रतिनिधीछत्रपत...
30/07/2025

🛣️ महाड-रायगड महामार्गाचे “छत्रपती महामार्ग” असे नामकरण होणार – छत्रपती संभाजीराजेंची माहिती

नवी दिल्ली | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीराजेंनी आज एका पोस्टद्वारे माहिती दिली की, महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या बैठकीत ही घोषणा झाली.

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने छत्रपती संभाजीराजेंनी महामार्गाच्या प्रगतीची माहिती गडकरींना दिली. यावेळी त्यांनी या मार्गाचे शिवकालीन ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत नामकरणाची मागणी केली होती, ज्याला गडकरींनी तत्काळ मान्यता दिली.

206 कोटींच्या निधीतून हा महामार्ग सध्या विकसित होत असून, ९०% काम पूर्ण झाले आहे. शिवराज्याभिषेक काळात होणारी गर्दी आणि दैनंदिन वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे.

या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकपर्यंतचा इतिहास उभा करण्यासाठी विश्रांतीस्थळे, पथदिवे, ऐतिहासिक शिल्प व सांस्कृतिक घटक उभारण्याची संकल्पना छत्रपती संभाजीराजेंनी मांडली, ज्यास गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अधिक निधीबाबत मार्गदर्शनही केले.

"शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी गडकरी साहेबांचे मन:पूर्वक आभार मानतो," असं छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

---

#छत्रपतीमहामार्ग #छत्रपतीसंभाजीराजे

निकष न पाळल्यास प्रवेश थांबवणार — बी.फार्म व डी.फार्म संस्थांना सरकारचा अल्टिमेटममुंबई : राज्यातील बी.फार्मसी आणि डी.फार...
30/07/2025

निकष न पाळल्यास प्रवेश थांबवणार — बी.फार्म व डी.फार्म संस्थांना सरकारचा अल्टिमेटम

मुंबई : राज्यातील बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा (निकष) एक महिन्याच्या आत पूर्ण कराव्यात, अन्यथा संबंधित संस्थांची प्रवेश प्रक्रिया (प्रथम वर्षासाठी होणारी कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा ठाम इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत २०२२ ते २०२५ या कालावधीत मान्यता प्राप्त बी.फार्म आणि डी.फार्म संस्थांच्या विविध निकष पूर्ततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांकडून आवश्यक प्रयोगशाळा, प्राध्यापकांची संख्या, ग्रंथालय, इमारत व अन्य मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा आणि रोजगारक्षमतेवर याचा परिणाम होत असल्याने शासन या बाबतीत ठोस भूमिका घेत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार... सोलापूर मह...
30/07/2025

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार...

सोलापूर महानगरपालिका आणि एम. आय. टी. कॉलेज, सोलापूर यांच्यात मा. आयुक्त यांच्या कार्यलायत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराचा उद्देश शैक्षणिक, महापालिकेचे विविध विभाग व शासकीय क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर करून शहरी प्रशासन अधिक सक्षम करणे हा आहे.

या करारानुसार एम. आय. टी. कॉलेजचे विद्यार्थी आणि संशोधक सोलापूर महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये AI आधारित संशोधन व अंमलबजावणी करतील. यामध्ये डेटा विश्लेषण, नागरी सेवा सुधारणा, स्मार्ट सिटी उपाययोजना, कचरा व्यवस्थापन, घंटा गाडी, पाणी पुरवठा,वाहतूक नियमन इत्यादी क्षेत्रांचा समावेश राहील.

सदर सामंजस्य करारावर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व एम. आय. टी. कॉलेजचे रजिस्ट्रार डॉ प्रणेश मुरनल, प्राध्यापक आनंद शिंपी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, सहा. आयुक्त शशिकांत भोसले, नगर सचिव प्रवीण दंतकाळे,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, संगणक प्रोग्रामर सेन्हल चफळगावकर, मतीन सय्यद दोन्ही आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होणार असून, सोलापूर महापालिकेच्या तांत्रिक क्षमतेत वाढ होणार आहे. आगामी काळात शहर प्रशासनात AI चा समावेश करून नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध प्रकरणे : पोलिसांकडे प्रलंबित ५१ गुन्ह्यांचा तिढा सुटणार?— निवासी उपजिल्हाधिकारी अ...
30/07/2025

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध प्रकरणे : पोलिसांकडे प्रलंबित ५१ गुन्ह्यांचा तिढा सुटणार?
— निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिल्या स्पष्ट सूचना

📍 सोलापूर | ३० जुलै २०२५

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत पोलिसांकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त करत, पुढील बैठकीपूर्वी ही प्रकरणे कमी करण्याचे स्पष्ट निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, अशासकीय सदस्य महादेव पाटील, तसेच पोलीस आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔍 अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

एकूण ५१ प्रकरणे पोलिसांकडे प्रलंबित
▪️ शहर पोलिसांकडे – ९ प्रकरणे
▪️ ग्रामीण पोलिसांकडे – ४२ प्रकरणे

मुख्य अडथळे – आरोपींची अटक, साक्षीदार तपासणी

आगामी बैठकीपूर्वी प्रकरणांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश

💰 पीडितांना तात्काळ अर्थसहाय्य द्या – पाटील यांचा आदेश

श्री. पाटील म्हणाले, “सन २०२१ ते जून २०२५ या कालावधीत १६९ प्रकरणांमध्ये पीडितांना अर्थसहाय्य देणे प्रलंबित आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाने शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी तातडीने उपलब्ध करून घ्यावा.”

सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी यावेळी माहिती दिली की, अर्थसहाय्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून, त्यात केंद्र व राज्य शासनाचा ५०-५० टक्के वाटा आहे. निधी प्राप्त झाल्यावर पीडितांच्या खात्यात थेट पैसे वर्ग केले जातील.

सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी FIR नोंदवण्याचे निर्देश कायम📍 नवी दिल्ली / परभणी | ३०...
30/07/2025

सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी FIR नोंदवण्याचे निर्देश कायम

📍 नवी दिल्ली / परभणी | ३० जुलै २०२५

परभणीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला चपराक दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला ‘एका आठवड्याच्या आत पोलिसांवर एफआयआर नोंदवा’ हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला.

या प्रकरणात आधी पोलिसांनी मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत जे.जे. रुग्णालयाच्या अहवालाचा दाखला देत सांगितले होते की, “सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे झाला.” मात्र सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी कोठडीत झालेल्या पोलिस मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. पण हा आदेश सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिला होता. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत राज्य सरकारची मागणी फेटाळली.

📌 प्रकाश आंबेडकरांचा सवाल : कोर्टाच्या अवमानाची कारवाई होणार का?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना प्रश्न उपस्थित केला की, "मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी अजूनही गांभीर्याने घेतलेले नाही. आजपर्यंत एफआयआर नोंदवलेला नाही, त्यामुळे आता पोलिसांवर आणि प्रशासनावर कोर्टाच्या अवमानाची कारवाई होईल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे."

🔍 सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे विचारणा केली की, “एफआयआर अद्याप का नोंदवला नाही?” यामुळे राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेसाठी हे प्रकरण अधिक गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे.

30/07/2025

Address

Main Road
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 13 NEWS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH 13 NEWS:

Share