Bharat News Express

Bharat News Express भारत न्यूज एक्सप्रेस सर्व सामान्य जनतेचा आवाज.

निळ्या रंगाच्या रॉकेलने आता चूल पेटत नाही, रॉकेल वर चालणारी कमांडर आता गावात दिसत नाही..!!ए.सी. च्या आधुनिक युगात काही व...
06/04/2025

निळ्या रंगाच्या रॉकेलने आता चूल पेटत नाही, रॉकेल वर चालणारी कमांडर आता गावात दिसत नाही..!!

ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगितले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही.
ख-या अर्थाने ग्रामिण भारत डोळ्यासमोर ठेऊन महींद्रा कंपनीने बनवीलेली कमांडर गाडी ग्रामिण भारताचा श्वास होती.
2000 सी सी चे दमदार DI इंजीन 62 हॉर्सपॉवर ची शक्ती अशा आयुधांनी सज्ज हे वाहन ऑफरोडवर एखाद्या अजेय योद्ध्याप्रमाणे होते.
नदी नाले असो डोंगर द-या असो , रस्ता असो की नसो कमांडरला कोणतीच अडचण रोखु शकत नसे. एखाद्या वेळी बंद पडली तरी इंजिन स्ट्रक्चर एवढे सोपे की कोणताही रोडसाईड मेकैनिक समस्या दुर करुन टाकायचा.
अगोदर रीवर्स सहीत चार गीअरची कमांडर पुढे पाच गीअरची झाली. कमांडरच्या ड्रायव्हरची बैठक अशी होती की ड्रायव्हर तीरपा बसायचा. बाहेरुन पाहील्यावर स्टेअरींगच्या मागे ड्रायव्हर कधीच बसलेला दीसत नसे . उजव्या बाजूने थोडासा पेंदा बाहेर काढुन हात तीरपे करुन कमांडरच्या ड्रायव्हींग सीटवर माणुस एकदा बसला की साक्षात सारथी बनल्याची फीलिंग यायची. या तीरप्या बसण्याचा एक फायदा अजुन होता, ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर कमितकमी चारजण अजुन बसवता यायचे. दुरुन पाहील्यावर समोर बसलेल्या पाच जणांपैकी गाडी नेमका कोण चालवतोय हे कमांडर बनवीणारा इंजिनीअरही ओळखु शकत नव्हता.

गाडीची सीटिंग कैपिसिटी दहा सीट्सची असली तरी, फक्त दहा सीट्स बसविणे म्हणजे गाडीचा अवमान असायचा.
मी सांगतो तुम्ही हीशोब लावा..
समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यातल्या समोरासमोरच्या सीटवर तीन इकडुन तीन तीकडुन, त्याच सीटच्या ग्यापीत एखादी बारीक बुढी कींवा दोन बारकी खोसायची. समोरच्या भागात असलेल्या स्टेपनीवर एक.. हुश्श..!! कीती झाले ? टोटल एकोणवीस, मागे लटकणारे उत्साही पोरं सोडुन द्या.. कंडक्टर गाडीच्या खालुनच ड्रायव्हरला चलो.. अशी हाळी द्यायचा आणी चालत्या गाडीत असा काही शीताफीने गाडीला लटकायचा की अहाहा..!! सारे प्रवासी एकदम इम्प्रेस.लहान पोट्टे बाट्टे त आपण पुढे चालून कंडक्टरच बनायचं हे ठरवून घ्यायचे. जवान पोरगी सोरगी अशा कौतुकाने कंडक्टरकडे पहायची जणु काही सुपरमैन होय..
खरी मजा तर इकडे कॉकपीटमध्ये यायची. ड्रावरसाहेब झोकात स्टेअरींग फीरवत आणी पैसेंजरच्या टांगीखालून हात घालून खपाखप गेर मारत साक्षात सुखोई 2000 चा आनंद घ्यायचे.
एखादा पैसेंजर ड्रायव्हरशी सलगी दाखवत, आपलं गाडीच्या बा-यातलं ज्ञान पाजळत म्हणायचा,
" क्यों ड्राव्हरसाब, गाडी भोत कन्हार रई ?"

ड्रायव्हर त्याच्याकडे न पाहता उत्तर द्यायचा,
हौ साला, पम का काम करना पडता."

पैसेंजर नोबेल जींकल्याच्या अविर्भावात आजुबाजुच्या पैसेंजरकडे तुच्छतेने पहायचा..

कमांडर अशी खरी लेकुरवाळी गाडी, ग्रामिण भारताचे हीमोग्लोबीन. काळाच्या ओघात आता गडप होत चाललेली कमांडर एखाद्या थकलेल्या जीवट व्रुद्धाप्रमाणे खेड्यापाड्यात आपले अस्तीत्व टीकवत तग धरुन आहे. भवीष्यात पुढच्या पिढीला एक दुर्मीळ वाहन म्हणुन संग्रहालयात कमांडर पहायला मिळेल..!...,

✒️...तीन मनोरंजक लघु कथा. या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. या कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल. तुम्हीही वाचा आणि आवड...
05/04/2025

✒️...तीन मनोरंजक लघु कथा. या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. या कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल. तुम्हीही वाचा आणि आवडल्यास पुढे पाठवा.

१. "गहन"

मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"

तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."

मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"

तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसले नाही!"

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?

२. "थकलेला"

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

३. "थांबा"

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीट पाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"

तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं. (ही पोस्ट कॉपी पेस्ट आहे आवडली म्हणून शेअर केली )

भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला!!!👸 🇮🇳🏆       .
20/01/2025

भारताच्या महिला संघानं खो-खो वर्ल्डकप जिंकला!!!
👸 🇮🇳🏆

.

 #सक्सेस_स्टोरी  ट्रांसपोर्ट किंग ऑफ इंडिया - फक्त एक ट्रक आणि 2 लाख कर्ज काढून सुरू केला ट्रॅव्हल्स व्यवसाय. आता 5700 ट...
20/01/2025

#सक्सेस_स्टोरी
ट्रांसपोर्ट किंग ऑफ इंडिया - फक्त एक ट्रक आणि 2 लाख कर्ज काढून सुरू केला ट्रॅव्हल्स व्यवसाय. आता 5700 ट्रक्सचे मालक असून कंपनीचा रेव्हेन्यू आहे 2900 कोटी रुपये.

कर्नाटकातील गदाग येथील विजय संकेश्वर यांनी कॉमर्समध्ये डिग्री घेतली. त्यांचे वडील धारवाडमध्ये पब्लिशिंगचा व्यवसाय करत होते, पण विजय यांना त्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांना स्वतःचा ट्रान्सपोर्ट बिझनेस सुरू करायचा होता.

1976 मध्ये, वडिलांचा विरोध झुगारून विजय यांनी 2 लाख रुपये कर्ज काढून एक ट्रक खरेदी केला आणि Vijayanand Transportation Company सुरू केली. सुरुवातीला त्यांना मोठ्या आर्थिक अडचणी आल्या, पण ते डगमगले नाहीत. मेहनत, चिकाटी आणि हुशारीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय वाढवत नेला.

हळूहळू एक ट्रक असलेल्या कंपनीत 5700 वाहने ॲड झाली. आज त्यांची कंपनी VRL Logistics भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक आहे. त्यांचे हेडक्वार्टर कर्नाटकमध्ये हुबळी येथे आहे. ही कंपनी 23 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.

व्यवसायाच्या यशानंतर, 2012 मध्ये त्यांनी 'विजयवाणी' हा कन्नडमधील प्रमुख न्यूजपेपर सुरू केला. आणि 2017 मध्ये 'दिग्विजय 24X7' नावाचे कन्नड न्यूज चॅनेल सुरू केले. 2022 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित "विजयानंद" हा चित्रपट प्रदर्शित झाला.

2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. FY24 मध्ये VRL कंपनीला 2909 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू मिळाला. कंपनीची मार्केट कॅप 6142 कोटी आहे. कंपनीने शेअर बाजारात 5 वर्षांत 115% रिटर्न दिले.

एका ट्रकपासून व्यवसाय सुरू करुन आज विजय संकेश्वर भारतातील ट्रान्सपोर्ट किंग बनले आहेत. त्यांची कहाणी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारी आहे.

मोहोळ तालुक्यातील खंडोबावाडीची लेक अश्विनी शिंदे हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या खो-खो वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघात नि...
19/01/2025

मोहोळ तालुक्यातील खंडोबावाडीची लेक अश्विनी शिंदे हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या खो-खो वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघात निवड झाली आहे. या यशामुळे तिने मोहोळ तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती उज्वल केलं आहे. तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. अश्विनीच्या यशामुळे तालुक्यातील युवकांना प्रेरणा मिळेल व या प्रेरणेतून अनेक नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास आहे. या घवघवीत यशासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!

अक्कलकोट - सोलापूर एस टी बस सन १९९२ मधील दुर्मिळ फोटो.
18/01/2025

अक्कलकोट - सोलापूर एस टी बस सन १९९२ मधील दुर्मिळ फोटो.

दया नायक ..मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचां. काम कशाच तर वेटरचं. त्याची आई माहेरात रहायची. वडिल अच...
17/01/2025

दया नायक ..
मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचां. काम कशाच तर वेटरचं. त्याची आई माहेरात रहायची. वडिल अचानक घर सोडून गेलेले. राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती. या पोरानं नकळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता. उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोरं होतं ते. मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून भुलायच वय ते. त्यातही हा काम करायचा, ते देखील बारमध्ये.

वर्सोवा भागतल्या बारमध्ये १९७९ च्या दरम्यान देखील, कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये. पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टिप देखील मिळायची.

१९८० सालात १००० रुपये मिळवणारा लहान पोरगा.

माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचां. घरची परिस्थिती त्यामुळेच सुधारू लागली. पण राहिलेल्या पैशाच काय?

राहिलेल्या पैशातून पोरगं शिक्षणाची स्वप्न बघायचं. वेळ मिळाला की पुस्तक वाचायचं. हॉटेलचा मालक शहाणा होता. त्याने या पोराचा अभ्यास पाहीला आणि नाईट स्कुलला अॅडमीशन करुन दिलं. आत्ता हॉटेलमालकाच्या कृपेनं पोरगं शाळा शिकू लागलं. दहावी, बारावी झाली. गावाकडच्या आईला पोरगं कमवतय याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता.

वेटरसोबत पोरगं प्लंबर झालेलं आणि सोबत MSc देखील. त्याला भेटणाऱ्या माणसांना भारी वाटायचं. आमच्या टेबलवर दारू देणारा MSc आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला.

अशाच एका रात्री त्यानं ठरवलं PSI परिक्षेचा फार्म भरायचा.

मित्रांकडून माहिती घेतली. पोलिस होण्याचं स्वप्न पाहीलं. पण ते सहज शक्य नव्हतं. वेटर, प्लंबर अशी काम सोडून तो दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला. काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशातच नव्हता.

बघता बघता त्या पोरानं PSI ची पोस्ट काढली. तेव्हा दुख: एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळच कोणीच नव्हतं. या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती, जुहूच्या टिडेक्शन विंगमध्ये.

वेटरचा शिक्का जावून अंगावर खाकी वर्दी आली होती. त्या वर्दीवर नेमप्लेट असायची, त्यावर लिहलं होतं.

सब इन्स्पेक्टर दया नायक.

आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती. तो नव्यानं दाखल झालेला एक पोलिस सब इन्स्पेक्टरच होता. शांतपणे तो नोकरी करत होता, पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात, तो प्रसंग आला..

त्याच्या समोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभा होते. त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला. छोटा राजनच्या टोळीतील गुंडावर हात टाकण्याचं धाडस एका पोलिस सब इन्स्पेक्टरने केलं होतं.

एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांच लक्ष त्याच्याकडे गेलं. हा कोण? याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली. सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी CIU ब्रॅन्चमध्ये केली. तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदिप शर्मा.

ते साल होतं १९९६ चं..

अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टिप प्रदिप शर्मांना मिळाली होती. त्याच चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. दोन पंटर खल्लास झाले पण एका सब इन्स्पेक्टरला एकांन्टर स्पेशॅलिस्ट बनवून गेले.

प्रदिप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता. त्याला मरायची भिती वाटतं नव्हती. तो फक्त मारायच्या गोष्टी करायचां.

रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडत गेलं. आत्ता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं. दयाच्या नावाने आत्ता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती.

२६ डिसेंबर १९९६.

सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं. सादिक शार्पशुटर होता. दोन्ही हातानं एका वेगात बंदुक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता. २६ डिसेंबरच्या दिवशी सादिक आणि दया नायकची कुस्ती संपुर्ण दादरच्या फुल मार्केटला पहायला मिळाली होती.

दादरच्या मार्केटमधून जात असतानाच सादिक दया नायकच्या रडारवर आला. पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिकवर हात टाकला. सादिक आणि दयाची कुस्ती चालू झाली. आत्ता दया नायक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुलानं देखील लावलेला. अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.

दया नायकचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपआपल्या घरी गेली होती. तोच दूसरी, तिसरी एकामागून एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला. दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा गेम केला.

दया नायकच्या नावावर ८० हून अधिक एन्कांन्टर जमा झाले होते. अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉंम्ब ठेवण्यात आला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रितीने दया नायक यातून वाचला. महिनाभर तो हॉस्पीटलमध्ये होता.

आत्ता दया नायकला सिनेमाहून अधिक फेम मिळू लागलं.

संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खंडण्यांचा धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं. फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत जोडला जावू लागलां.

अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिक होतं. पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठ्ठ मोठ्ठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते. दया नायक एन्कांटर स्पेशॅलिस्ट असला तरी तो एक सब इन्प्सेक्टर होता. त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणार होतं. त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला, पण त्यातूनही तो सहिसलामत सुटला. दया नायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते.

पण दया नायकच्या तक्रारींचा पाढा वाढतच होता.

त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दर वेळी वाढवणारी उदाहरणे दिसतं होती. शेवटी एंन्टी करप्शन ब्रॅन्चने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला. २००६ साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली. दोन महिने एन्कांटर स्पेशॅलिस्ट जेलमध्ये होता. मिडीयाच्या नजरेतून हे बातमीमुल्य होतं.

दया नायक जेलमध्ये हि बातमी टिआरपी वाढवणारी होती. पण त्यामुळे दया नायकडे बघणारी नजर बदलली. त्याने केलेल्या एन्कांन्टवर संशय घेण्याच काम घेण्याच काम देखील करण्यात आलं.

तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं. याच २००९ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डिजीपी एस.एस.विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला.
इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोधच होता. २०१० साली सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले. तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला. इतक्या काळानंतर देखील दया नायक एक पोलिस सब इन्प्सेक्टरच होता.

२०१८ साली त्याचं प्रमोशन झालं होतं. आत्ताही तो मुंबई पोलिसमध्येच आहे. ते हि पोलीस इन्प्सेक्टर म्हणून. पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच. अशा या वादळात देखील तो खंबीरच असतो...
Copy paste

मिलिंद भागवत यांनी घेतला News18 लोकमतचा निरोप, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय----------मुंबई - गेल्या 25 वर्षांपा...
15/01/2025

मिलिंद भागवत यांनी घेतला News18 लोकमतचा निरोप, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय
----------

मुंबई - गेल्या 25 वर्षांपासून टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर सातत्याने दिसणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा लोकप्रिय चेहरा मिलिंद भागवत यांनी News18 लोकमतचा निरोप घेतला आहे. टेलिव्हिजनमधील आपल्या प्रदीर्घ प्रवासाला विराम देत आता ते सामाजिक कार्यात सक्रिय होणार आहेत.

मिलिंद भागवत यापूर्वी एबीपी माझामध्ये अनेक वर्षे कार्यरत होते. रात्री 10 च्या बातम्या सादर करणारे आणि त्या साठी विशेष प्रसिद्ध असलेले मिलिंद भागवत शांत, संयमी आणि स्पष्टवक्ते अँकर म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकले.

25 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत मिलिंद भागवत यांनी पत्रकारितेत अनेक महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या. त्यापैकी 10 वर्षं News18 लोकमत मध्ये होते. हा काळ त्यांच्या सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना "अतिशय साधा माणूस, संवेदनशील पत्रकार आणि मदतीला नेहमीच तयार असलेला बाॅस" म्हणून ओळखलं.

मिलिंद भागवत यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल आणि त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील नवीन प्रवासासाठी सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नव्या वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!

09/01/2025
अभिनेत्री गिरीजा ओक मराठीतील नावाजलेली अभिनेत्री. हिंदीतही तिने बरंच नाव कमावलंय. नुकतंच आरपार या युट्युब चॅनलला दिलेल्य...
09/01/2025

अभिनेत्री गिरीजा ओक मराठीतील नावाजलेली अभिनेत्री. हिंदीतही तिने बरंच नाव कमावलंय. नुकतंच आरपार या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कामाच्या ठिकाणी मुलींबद्दल विचार केल्या जाणाऱ्या मानसिकतेवर टिका केली आहे.

Address

Satta Struggle News Office Markat Yard Tembhurani Tal Madha Dist Solapur
Tembhurni
413211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat News Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharat News Express:

Share