27/05/2026
Today Update: ठाणे-कळव्यात जुगार-मटका माफियांचे निर्धास्त काळे साम्राज्य: ठाणे सिटी पोलिसांची फक्त ट्विटरवर ‘खोट्या कारवाई’ची भूमिका!
७ एप्रिल २०२६ रोजी मी माझ्या ट्विटर हँडलद्वारे पहिले ट्विट करून सांना कळवा पोलीस ठाणे आणि ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार क्लब आणि मटक्याची माहिती दिली होती.
तेव्हापासून आजतागायत ना कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सातपुते यांनी कोणतीही कारवाई केली, ना ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चौधरी यांनी यावर काही पाऊल उचलले. ग्राउंड
सत्य परिस्थिती अजूनही जशीच्या तशीच आहे.
🚨 अवैध धंद्यांचे अचूक लोकेशन आणि ग्राउंड रिपोर्ट
१. लोकेशन: कळवा (अवैध मटका)
▪️अचूक पत्ता: ओल्ड पुणे रोड, नॅशनल बार अँड रेस्टॉरंटच्या गल्लीत.
▪️मुख्य बाब: या मटक्याच्या धंद्यात कथितपणे भोसले नावाचा एक पोलीस कर्मचारी देखील थेट सामील (Involve) आहे.
२. लोकेशन: कळवा (जुगार क्लब)
▪️अचूक पत्ता: टकोली मोहल्ला, गाडियाल चौकजवळ, पंक्चरच्या दुकानाच्या बाजूच्या गल्लीत.
▪️संचालक: विटावा गावातील एक व्यक्ती हा जुगार क्लब अत्यंत निर्धास्तपणे चालवत आहे.
३. लोकेशन: ठाणे नगर पोलीस स्टेशन हद्द (अनंता क्लब)
▪️अचूक पत्ता: नागरिक स्टोअर्सच्या गल्लीत असलेला “अनंता क्लब”.
▪️संचालक: विष्णू शेठ.
▪️काळे साम्राज्य: पहिल्या मजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत जुगाराचे अनेक टेबल लावण्यात आले आहेत. येथे दररोज सुमारे ५० लाख रुपयांची अवैध काळ्या पैशांची उलाढाल (Turnover) होत आहे. अखेर याला जबाबदार कोण?
📌 जुन्या कारवाईची नोंद: वर्ष २०२२ मध्ये ठाणे सिटी पोलिसांच्या माजी आयुक्तांनी याच 'अनंता क्लब'सह जवळच सुरू असलेल्या “एकवीरा क्लब” वर देखील मोठी धाड टाकून तो सील केला होता. परंतु आज हे धंदे पुन्हा जोमात सुरू आहेत.
आदेशांची पायमल्ली आणि उपस्थित होणारे गंभीर प्रश्न?
▪️ट्विटर व्हर्सेस जमिनीवरील वास्तव: माझा थेट सवाल आहे कि ठाणे सिटी पोलिसांची काही जमिनी जबाबदारी आहे की नाही? की फक्त ट्विटरवर "कारवाई केली जात आहे" अशी औपचारिक पोस्ट टाकून खरी परिस्थिती लपवली जाते?
▪️गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशांचा अवमान: महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनीही सर्व जुगार क्लब आणि मटका धंद्यांवर कडकडात कारवाई करण्याचे कडक आदेश दिले आहेत. जेव्हा राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाचीच पायमल्ली होत असेल, तर याला प्रशासनाचा उघड अवमान का मानू नये?