News Disha

News Disha News Disha Is Marathi News agency, It Provide All Latest News Of Mumbai,Thane And Maharashtra, India

मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या विजयी उमेदवारांन...
22/08/2025

मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढी निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष बबन शिरोडकर, सरचिटणीस सूर्यकांत शिंदे, खजिनदार अजित झाझम, सहकार्याध्यक्ष किशोर घाडी, अमोल म्हात्रे आदी पदाधिकारी तसेच विजयात मोलाचा वाटा उचललेले पदाधिकारी, सेवानिवृत्त पदाधिकारी उपस्थित होते.

आयटी सेक्टर, नवीन स्टार्ट-अप्ससाठी मराठी मुलांना घडवणार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा मेळावा उत्साहातठाणे (प्रतिनिधी...
22/08/2025

आयटी सेक्टर, नवीन स्टार्ट-अप्ससाठी मराठी मुलांना घडवणार

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा मेळावा उत्साहात

ठाणे (प्रतिनिधी) : शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार
गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा स्थापनापूर्व मेळावा शुक्रवारी मुंबईत उत्साहात पार पडला. येत्या सप्टेंबरमध्ये समितीची अधिकृत स्थापना होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी उपस्थितांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठकीला संबोधित केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापनेपासूनच मराठी युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या ध्यासाने कार्यरत आहे. त्यामुळे आज अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मराठी युवकांना नोकऱ्या मिळाल्या असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात या समितीच्या माध्यमातून बदलत्या काळात आयटी सेक्टर वा नवीन स्टार्ट-अप्स आणि इतर सर्व क्षेत्रांत मराठी तरुणांनी कसे प्राधान्य देता येईल आणि त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी निश्चित काम हाती घेण्यात येणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पेटवलेला लोकाधिकार समितीचा हा यज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य आपण करीत आहोत आणि या महासंघ स्थापनेतून त्याला नवी दिशा मिळणार आहे. येणाऱ्या काळात सगळ्यांनी संघटितपणे, जोमाने आणि निष्ठेने काम करून मराठी युवकांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावी लढा उभारू या, असे आवाहन शिंदे यांनी या मेळाव्यात केले.
शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार
गजानन किर्तीकर यावेळी म्हणाले की, शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना राज्यात जोमाने काम करत आहे. मराठी तरुणांसाठी रोजगार, मराठी नागरिकांसाठी मुंबईत घरांचा प्रश्न, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावण्यात आले आहेत. येत्या काळातही याच पद्धतीने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.शिवसेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.

समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा- पालकमंत्री गणेश नाईकपालघर- दिनांक २० ऑगस्ट : कोणताही भेदभाव ...
20/08/2025

समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा- पालकमंत्री गणेश नाईक

पालघर- दिनांक २० ऑगस्ट : कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समतेच्या मार्गाने सोडवणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
जव्हार येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी पावसाची तमा न बाळगता उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे ,सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, विशाल खत्री, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी भवानजी आगे पाटील, जव्हार,उपवनसंरक्षक सैपुन शेख, डहाणू,उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी महेश सागर, विजया जाधव, रणजित देसाई तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट केले की मागील काही वर्षांत मध्ये विकास कामाबाबतीत अनियमित्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीचा न्याय भावनेने विचार करून सर्व कामांची चौकशी करण्यात येईल
अनियमित्ता आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
या जनता दरबारात जवळपास 150 निवेदन प्राप्त झाले या मध्ये. रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, शाळांची पडझड, आरोग्य सेवा, जमीन अधिग्रहण व मोबदला यासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

विकास कामासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांना योग्य निधी वाटप करून तातडीने विकास कामे राबवली जाणार आहेत.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे ही शासनाची भूमिका आहे.
पर्यावरण विभागाच्या अनुषंगाने वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून, शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
, ग्रामविकास, वनहक्क, जमीन मोबदला, टॉवर व गॅस पाईपलाईन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिल

मीरा भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे दुःखद निधन..  #भावपूर्णश्रद्धांजली
18/08/2025

मीरा भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे दुःखद निधन.. #भावपूर्णश्रद्धांजली

18/08/2025

ठाणे,मुंबईतील शाळांना सुट्टी

सोमवारी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कळाले सुट्टी आहे

ठाणे (प्रतिनिधी ) : मुंबई, ठाणे तसेच उपनगरात सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्यामुळे शिक्षण विभागाने पावसाचा धोका ओळखून सोमवारी संध्याकाळी मंगळवारी शाळांना सुट्टी असल्याचे जाहीर केले. मात्र ठाणे आणि मुंबईत पावसाचा अंदाज असताना देखील शाळांनी सुट्टी न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर शाळांना सुट्टी असल्याचे कळले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.
मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई तसेच ठाणे शहरात पाऊस कोसळत आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार पावसाने हजेरी लावली असली तरी मुसळधार असा पाऊस कोसळला नव्हता. परंतु, सोमवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली. तर, नोकरदार वर्गाचे हाल झाले. त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. तर, शहरात अनेक सखल भागात या पावासामुळे पाणी साचले होते.
घोडबंदर भागातील गायमुख परिसरात असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी खाली रस्त्यावर आले. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी रस्त्यात साचले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होता. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली.
मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने बोटीच्या माध्यमातून संबंधित परिसरातील नागरिकांना मदत पुरविल्या. त्याचप्रमाणे पावसात सापडलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरविण्यात आली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.

आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते कल्याण ग्रामीणमध्ये  वैद्यकीय मदत कक्ष, रस्त्याचे लोकार्पण ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण ग्रा...
18/08/2025

आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते कल्याण ग्रामीणमध्ये वैद्यकीय मदत कक्ष, रस्त्याचे लोकार्पण

ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण ग्रामीण शहर प्रमुख अमित संभाजी कोलेकर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अनावरण तसेच भुमी कॉम्प्लेक्स येथील मुख्य रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण व अनावरण कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून विष्णुशेट गायकवाड (माजी नगरसेवक), महेश गायकवाड (माजी नगरसेवक) आणि विजय भाणे (विभागप्रमुख) उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे यावेळी म्हणाले की, समाजासाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना तातडीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर भुमी कॉम्प्लेक्स परिसरातील मुख्य रस्ता सुरु झाल्यामुळे वाहतुकीची सोय सुलभ होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव सोहळा !ठाणे (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे कराड को-ऑपरेटिव्...
18/08/2025

कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव सोहळा !

ठाणे (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी सोहळा दिमाखात पार पडला, गेले २५ वर्षे आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या संस्थेचा हा गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री गणेश नाईक म्हणाले की, "कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेने गेल्या २५ वर्षांत केवळ आर्थिक व्यवहारच नाही, तर विश्वास आणि आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. संस्थेचे संस्थापक, संचालक, कर्मचारी वर्ग आणि सभासद यांच्या मेहनतीमुळेच आज ही संस्था यशाच्या शिखरावर पोहोचली असल्याचे नाईक यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी, संस्थेच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी संचालकांचा आणि सभासदांचा सत्कार करण्यात आला.

मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेशमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधि...
18/08/2025

मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कायद्यात बदल करून कामगार हीत कसे साध्य करता येईल याचा विचार आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय वेतन कायदा तुम्हा सर्वांना लागू झाला आहे. त्यामुळे वर्षात दोन वेळा वेतनवाढ होणार आहे. सेवाक्षेत्रात कुठलीही कसूर न ठेवता उत्तम सेवा कशी देता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.
सुहास माटे म्हणाले की 9 जून रोजी किमान वेतनासाठी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने करार केला त्यानंतर पगारवाढ झाली. गेल्या काही महिन्यांत कामगारांना त्यांचे हक्क देण्याचा भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केला. भाजपा आणि चव्हाण यांच्या कार्यशैलीवर विश्वास बसल्याने सर्व पदाधिका-यांनी आणि कामगारांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे कामगार सेनेच्या विमानतळ कामगार संघटनेचे निलेश कोळेकर, संजय गुणके, दत्ता भोसले, विवेकानंद कांबळे महेंद्र पांडे, रत्नाकर गांधी, राजेंद्र धुमाळ, वैभव कोकरे, विनोद कांबळे, लक्ष्मण चौगुले, प्रवीण पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .

ठाण्यात तीज महोत्सवातून बंजारा संस्कृतीचे जागरशेकडो महिलांनी घेतला सहभाग, आपली परंपरा जपण्याचे केले संकल्पठाणे (प्रतिनिध...
18/08/2025

ठाण्यात तीज महोत्सवातून बंजारा संस्कृतीचे जागर

शेकडो महिलांनी घेतला सहभाग, आपली परंपरा जपण्याचे केले संकल्प

ठाणे (प्रतिनिधी) : बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा असलेला तिज उत्सव ठाण्यातील पातलीपाडा डोंगरीपाडा येथे गणेश मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी सन पूर्वपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव डोंगरीपाडा येथील गणेश मंदिरात करण्यात आला.

ठाण्यातील पातलीपाडा येथे राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलं आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या. पातलीपाडा येथे राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले. नायक रणजीत राठोड, कारभारी रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते नारायण आडे, लहू राठोड, सावन जाधव, पत्रकार अनिल जाधव यांचे कार्यक्रम आयोजनात मोठे योगदान लाभले. तांडा समृध्दी योजनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अनिल राठोड यांनी उपस्थियांना शुभेच्छा दिल्या.

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य धर्मदाय रुग्णालय देखरेख समितीचे मुंबई विभाग प्रतिनिधी कविराज चव्हाण म्हणाले की, महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून आपली संस्कृती येणाऱ्या पिढीला कळविण्याचे एक मोठे माध्यम हे महोत्सव असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

RSD BUILDINFRA LLP तर्फे आज सत्यनारायण पूजनाचा पवित्र सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री. स...
18/08/2025

RSD BUILDINFRA LLP तर्फे आज सत्यनारायण पूजनाचा पवित्र सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री. संकेत सदानंद नाझरे, तसेच श्री. मयुरेश केणी, श्री. सूर्यकांत गायकवाड, कोकण पदवीधर मतदारसंघ प्रकोष्ठ श्री. सचिन मोरे, भाजपा सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री. प्रकाश गाडे उपस्थित होते.

श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने भरलेल्या या मंगल प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन यश, समृद्धी व उत्तम भविष्याची प्रार्थना केली.

📍 ठाणे
🗓️ १८ ऑगस्ट २०२५

🗓 १६ ऑगस्ट २०२५ |📍 ठाणेसंस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी! संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित "संस्कृतीची दहीहंडी, वि...
16/08/2025

🗓 १६ ऑगस्ट २०२५ |📍 ठाणे

संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी!

संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित "संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी" मध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर लावून विश्वविक्रमाची नोंद केली.

आज माझा मुलगा पुर्वेश याचे स्वप्न पूर्ण झाले. याचा मला आनंद आहे. या पथकाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून मानवी मनोरे रचून दिलेली ही सलामी संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🇮🇳

🗓 16 August 2025 | 📍 Thane

Sanskruti’s Dahi Handi – A World Record Dahi Handi!

At the Sanskruti Yuva Pratishthan organized “Sanskruti’s Dahi Handi, World Record Dahi Handi,” the Kokan Nagar Govinda Pathak created history by forming a 10-tier human pyramid, setting a world record.

Today, my son Purvesh’s dream has come true and that brings me immense joy. A prize of ₹25 lakh was announced for this team and this salute given through the human tower is a proud moment for the entire nation. 🇮🇳




🔸 स्वातंत्र्य दिनानिमीत्त स्वच्छता अभियान...📍 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, पालघर आणि टाटा स्ट...
14/08/2025

🔸 स्वातंत्र्य दिनानिमीत्त स्वच्छता अभियान...

📍 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, पालघर आणि टाटा स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव, बोईसर येथील समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

📍 स्वच्छतेसोबतच या अभिनायातून डेंग्यू, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Cmrf Maharashtra
CMOMaharashtra
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, अधिकृत

Address

Thane
400607

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Disha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share