20/08/2025
समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा- पालकमंत्री गणेश नाईक
पालघर- दिनांक २० ऑगस्ट : कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समतेच्या मार्गाने सोडवणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
जव्हार येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी पावसाची तमा न बाळगता उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे ,सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, विशाल खत्री, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी भवानजी आगे पाटील, जव्हार,उपवनसंरक्षक सैपुन शेख, डहाणू,उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी महेश सागर, विजया जाधव, रणजित देसाई तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट केले की मागील काही वर्षांत मध्ये विकास कामाबाबतीत अनियमित्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारीचा न्याय भावनेने विचार करून सर्व कामांची चौकशी करण्यात येईल
अनियमित्ता आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
या जनता दरबारात जवळपास 150 निवेदन प्राप्त झाले या मध्ये. रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, शाळांची पडझड, आरोग्य सेवा, जमीन अधिग्रहण व मोबदला यासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
विकास कामासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांना योग्य निधी वाटप करून तातडीने विकास कामे राबवली जाणार आहेत.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे ही शासनाची भूमिका आहे.
पर्यावरण विभागाच्या अनुषंगाने वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून, शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
, ग्रामविकास, वनहक्क, जमीन मोबदला, टॉवर व गॅस पाईपलाईन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिल