News Disha

News Disha News Disha Is Marathi News agency, It Provide All Latest News Of Mumbai,Thane And Maharashtra, India

10/06/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दारू पिणार्‍या परप्रांतीयांना मनसेनी दिला प्रसाद
ठाणे : ठाण्यातून मीरा रोड येथे जाणार्‍या मीरारोडच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर रोज अनेक परप्रांतीय उभे राहून दारू पितात, पोलिसांना अनेकवेळा तक्रार करूनदेखील या परप्रांतीय दारुड्यानचि संख्या कमी होत नसल्यामुळे मनसैनिकांनी या परप्रांतीय लोकांना चांगलाच धडा शिकवला..
#ठाणे #कल्याण

ठाणे शहरात एका तासात दोन हत्या...ठाण्यात परप्रांतीयांचा हैदोस..ठाणे : एक तुळशीधाम येथे तर दुसरी ठाणे शहराचे प्रमुख स्थान...
10/06/2026

ठाणे शहरात एका तासात दोन हत्या...ठाण्यात परप्रांतीयांचा हैदोस..
ठाणे : एक तुळशीधाम येथे तर दुसरी ठाणे शहराचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या तलावपालीवर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी याच तलावपाली परिसरात एक व्यक्तीवर गर्दुल्याने ब्लेड ने वार करत वृद्ध व्यक्तीला गंभीर जखमी केले होते तर काल ज्युपिटर हॉस्पिटल समोर परप्रांतीयांनी वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण करत जखमी केले होते..
#ठाणे #रायगड #कल्याण

मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही व काही ‘काम’ही नाही: हर्षवर्धन सपकाळपंडित जवाहरलाल नेहरु व नरेंद्र मोदींची तुलनाच होऊ शकत नाह...
10/06/2026

मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही व काही ‘काम’ही नाही: हर्षवर्धन सपकाळ
पंडित जवाहरलाल नेहरु व नरेंद्र मोदींची तुलनाच होऊ शकत नाही; कुठे नेहरु आणि कुठे मोदी? मोदींचे योगदानच काय?
मुंबई : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत असा ढोल पिटला जात आहे परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्ष देशाला मोजावी लागणार आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला हमीभाव देणार, १०० स्मार्ट सिटी निर्माण करणार, दहशतवादाचा बिमोड करणार, पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटर तर गॅस सिलेंडर १०० रुपयाला देणार आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या पण यातील एकही काम झालेले नाही. रुपया घसरत १०० च्या जवळ पोहचला, जीडीपी घसरला, ‘मेक इन इंडिया’ फेल गेला, ‘स्टार्टअप’ फेल गेला आणि अमेरिकेसमोर मोदी सरंडर झाले हे त्यांचे कर्तृत्व आहे. मोदींच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला असून ‘हम दो, हमारे दो, अशी या सरकारची ओळख झाली असून मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.

पंडित जवाहरलाल नेहरुंनी स्वातंत्र्यानंतर भारताला जगात एक महत्वाचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करुन दिली. मोठी धरणे बांधली, इस्त्रो, भाभा अणुशक्ती केंद्र, IIT, IIM, सारख्या संस्था उभ्या केल्या. विविध क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नेहरुंचे नेतृत्व जगाने मान्य केले. पंडित नेहरु स्वातंत्र्य चळवळीत ११ वर्षे जेलमध्ये होते. पंडित नेहरु, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वात देशाने विकास व प्रगतीचा मोठा टप्पा गाठला. राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली, २१ शतकात देशाला घेऊन गेले, सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तर शिक्षण हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा, अशा योजना काँग्रेस सरकारने आणल्या. काँग्रेसच्या सरकारने नवी आर्थिक क्रांती आणली, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली पण मोदींनी काय केले, हा मोठा संशोधनाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले..

मंत्री गिरिश महाजनांचे विधान राष्ट्रद्रोही...
फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली व खलिस्तानचे समर्थन करत ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा काळा दिवस होता असे विधान करून देशाच्या अखंडतेसाठी केलेल्या मोहिमेचा, भारताच्या लष्कराचा व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाचा घोर अपमान केला आहे. सर्वात गंभीर म्हणजे महाजन यांचे विधान खलिस्तानचे समर्थन करणारे आहे, दहशतवादाचे समर्थन करणारे आहे. या देशाने दहशतवादीची मोठी किंमत मोजली आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले, याचा महाजन यांनी अपमान केला आहे. देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरु असताना महाजन व त्यांच्या पक्ष हा इंग्रजांच्या बाजूने होता आणि दुर्दैवाने ते आज सत्तेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य देशाच्या एकता व अखंडतेला सुरुंग लावणारे असून या राष्ट्रद्रोही विधानाबद्दल त्यांची मंत्रिमंडळ व भाजपा पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, पण तसे होत नसून महाजन यांचे समर्थन केले जात आहे, हे त्यातून दुर्दैवी आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

#ठाणे #रायगड

शंकर महाराजांच्या आरतीची ध्वनिचित्रफित प्रदर्शित ठाणे (प्रतिनिधी) : सदगुरू शंकर महाराज यांच्या आरतीची ध्वनिचित्रफित आज द...
10/06/2026

शंकर महाराजांच्या आरतीची ध्वनिचित्रफित प्रदर्शित
ठाणे (प्रतिनिधी) : सदगुरू शंकर महाराज यांच्या आरतीची ध्वनिचित्रफित आज दत्तवाडी, कळवा येथील मठात प्रदर्शित करण्यात आली. ही आरती गाणार्‍या पार्श्वगायिका निहिरा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यावेळी उपस्थित होते. धनकवडीस्थित सदगुरू शंकर महाराज यांचा अत्यंत देखणा आणि अध्यात्मिक अनुभूती देणारा मठ दत्तवाडी कळवा येथे उभारण्यात आला आहे. या मठामध्येच सारेगामा फेम तथा बंटी बबली सिनेमात पार्श्वगायन केलेल्या गायिका निहिरा जोशी यांनी ही आरती चित्रीत केली आहे. शंकर महाराजांचे निस्सीम भक्त मनोज प्रधान यांनी त्यासाठी गायिका जोशी यांना साह्य केले आहे. आज सायंकाळी ही आरती पत्रकार परिषदेत प्रदर्शित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी, आईच्या सांगण्यावरून मी शंकर महाराजांचे आध्याय वाचू लागलो. त्यानंतर मला मठातून आसन मिळाले. अन् मी अडचणीत असताना शंकर महाराजांनीच वाचविले आहे. पुण्यात जाणे शक्य नसल्याने, मठ ठाण्यात उभारावा अशी इच्छा शंकर महाराजांकडे व्यक्त केली अन् त्यांच्याच इच्छेने हा मठ उभा राहिला, असे सांगितले.. तर निहिरा जोशी म्हणाल्या की, शंकर महाराज यांच्या पोथीतील आरती गाण्याचा प्रयत्न केला. तुषार देओल यांनी संगीत संयोजन केलेल्या या आरतीचे चित्रीकरण कुठे करावी , ही अडचण होती. मात्र, शंकर महाराजांच्या भक्तीतूनच मला हा मठ गवसला आणि मी इथे आले. मनोज प्रधान यांच्या सहकार्यातून ही आरती चित्रीत झाली. उद्या (दि. 11) ही आरती युट्यूब सह सर्व माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे सांगितले.
#ठाणे

'पॉश'  कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावीकामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देशमुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे ...
10/06/2026

'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश
मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात 'पॉश ' च्या अधिक परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम, उपसचिव दीपक पोकळे, यशस्वी ग्रुपचे विश्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कामगार मंत्री म्हणाले, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी व्यवस्था उभी करावी, अशी व्यवस्था असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे 'अंतर्गत समिती' स्थापन करणे बंधनकारक आहे. खाजगी आस्थापनांमध्ये या समित्यांचे कामकाज योग्य रीतीने चालते की नाही, याची तपासणी करावी.
या अंतर्गत समितीच्या अंतर्गत परीक्षणाची व्यवस्था उभारावी. त्यासाठी काही अभ्यासक्रम तयार करत येतो का याबाबत पडताळणी करावी. हा अभ्यासक्रम पूर्णपणे 'प्रमाणपत्र आधारित' असावा का, याबाबत कायदेविषयक बाबी तपासून अंतिम मसुदा तयार सादर करावा. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानकारक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. २०१३ च्या कायद्याची केवळ औपचारिकता न राहता त्याची १०० टक्के कडक अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.
#ठाणे #रायगड #कल्याण

महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात खासदार नरेश म्हस्के आक्रमकमहावितरण कार्यालयावर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखा...
10/06/2026

महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात खासदार नरेश म्हस्के आक्रमक
महावितरण कार्यालयावर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
नवी मुंबई (प्रतिनिधी) : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणं, कमी दाबाचा वीजपुरवठा, रखडलेली सबस्टेशनची कामे, वाढत्या तांत्रिक समस्या, तासंतास नागरिकांना अंधारात राहावे लागणं या समस्या वारंवार घडत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने ऐरोली आणि बेलापूर महावितरण कार्यालयावर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
बेलापूर येथे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश (बाबा) कदम, बेलापूर विधानसभा शहरप्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महानगरपालिका गटनेते मनोज हळदणकर, ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाताई म्हात्रे, शिवसेना संघटक सरोजताई पाटील, महिला संघटक शितलताई कचरे, नेरुळ विभागप्रमुख विजय माने, ज्येष्ठ नेते अंकुश सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख ममित भोईर, युवासेना ऐरोली विधानसभा शहरप्रमुख चेतन पाटील, नगरसेविका अनिता मानवतकर, नगरसेविका चैताली पाटील, समाजसेवक भावेश पाटील, सुरेश मानवतकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐरोली येथे गटनेते मनोज हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख अंकुश कदम, नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा हेमांगी सोनवणे, ऐश्वर्या सोनवणे, वैशाली पाटील, पूजा पाटील, आकाश मढवी, राजू पाटील, अंकुश सोनवणे, गगनदीपसिंग कोहली तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई हे देशातील एक नियोजित आणि आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आजही नागरिकांना वीजेची समस्या जाणवत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वातावरणीय बदलामुळे भयंकर उकाड्याने रहिवशांचा जीव कासाविस होत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली. स्वत: खासदार नरेश म्हस्के यांनी या आंदोलनात सहभागी होत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं.

नवी मुंबईसाठी स्वतंत्र केबल्स नागपूर आणि सिंधुदुर्ग येथून मागविण्यात आल्या असून चुकीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही सत्ताधारी असलो तरी जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. येत्या काळातही समस्या कायम राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशाराही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.यावेळी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
#रायगड #ठाणे

10/06/2026

वृद्ध आजोबांना मारहाण करणाऱ्या इसमावर ३०७ गुन्हा दाखल करा उपमुख्यमंत्री डॉ."एकनाथराव शिंदे" यांनी पोलिसांना दिले आदेश..!
ठाणे : काल ज्युपिटर हॉस्पिटल च्या बाहेर एका वृद्ध व्यक्तीला ओला वाहन चालकांनी बेदम मारहाण केली होती, त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध आजोबांना मारहाण करणाऱ्या इसमावर ३०७ गुन्हा दाखल करा उपमुख्यमंत्री डॉ."एकनाथराव शिंदे" यांनी पोलिसांना दिले आदेश..!
#ठाणे #कल्याण #रायगड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य व निरंतर राष्ट्रसेवेसाठी आमदार ॲड. न...
10/06/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य व निरंतर राष्ट्रसेवेसाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते ठाण्यात महाआरती

Thane : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपच्या वतीने विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. वसंत विहार नाका येथील हनुमान मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशाच्या सततच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार व भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, गेल्या बारा वर्षांत भारताने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली असून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.

कोरोना महामारीच्या काळात जगभरातील अनेक देश आर्थिक संकटात सापडले असताना भारताने केवळ परिस्थितीचा यशस्वी सामना केला नाही, तर जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून स्वतःचे स्थान कायम राखले, असे डावखरे म्हणाले. तसेच सध्या जगभरात युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थिती असतानाही भारत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर असल्याचा दावाही त्यांनी केला."पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि सामाजिक कल्याण योजनांमुळे देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे," असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. "देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून काहीजण केवळ राजकीय कारणांमुळे टीका करत आहेत. मात्र विकासाची कामे जनतेसमोर स्पष्टपणे दिसत आहेत," असे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले.देशभरातील विविध मंदिरांमध्ये पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आरती आणि प्रार्थना करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी सर्व भारतीयांच्या सुख-समृद्धीसाठीही प्रार्थना केली. "भारत अधिक समृद्ध, सुजलाम-सुफलाम होवो आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व समृद्ध जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे," असे ते म्हणाले.
दरम्यान, समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती आणि प्रचाराविरोधातही त्यांनी भूमिका मांडली. जातीभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती सहन केल्या जाणार नाहीत आणि अशा प्रकरणांमध्ये सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.या महाआरती कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ठाणे #कल्याण

10/06/2026

ठाण्याचा बिहार होतोय... परप्रांतीय ओला चालकांकडून एका वृद्ध व्यक्तीला मारहाण..
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर काल सायंकाळी सहा वाजताचा सुमारास किरकोळ कारणावरून एका परप्रांती ओला चालकाने वृद्ध व्यक्तीला अत्यंत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे हे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नितेश पाटोळे यांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर, या दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तात्काळ शोध घेऊन 'त्या' परप्रांतीय ओला चालकाला पकडून शिवसेना स्टाईलने चोप दिल्यानंतर. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी आरोपीला तात्काळ वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
#ठाणे

न शिकण्याचा धडामुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावर मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान लोकलगाडीतून पडून पाच प्रवाशांचा बळी गेला, त्...
09/06/2026

न शिकण्याचा धडा
मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावर मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान लोकलगाडीतून पडून पाच प्रवाशांचा बळी गेला, त्या घटनेस वर्ष उलटले. मात्र अशा घटनांमधून धडा शिकण्याचे औचित्य रेल्वेने दाखविलेले नाही. मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावर वर्षभरात ४ हजार अपघात घडतात आणि त्यात २२०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू होतो. म्हणजे दिवसाला सरासरी सहा प्रवासी लोहमार्गावर आयुष्ययात्रा संपवितात. यातले सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना होतात. धावत्या लोकलमधून पडून, तसेच रेल्वेखांबाला धडकूनही अनेकांचा बळी जातो. मात्र, आपले लोकप्रतिनिधीही हा प्रश्न लावून धरत नाहीत.
काही स्वयंसेवी कार्यकर्ते किंवा अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती रेल्वेसुरक्षेचा प्रश्न लावून धरतात. रेल्वे प्रशासनाने याबद्दल प्रवाशांशी कधी संवाद साधलेला नाही. मुंब्रा घटनेनंतर रेल्वेने दिलेली आश्वासने कशी कागदावरतीच उरली, याची मालिकाच मराठी वृत्तपत्रांनी मुंबईत प्रसिद्ध केली आहे. सरकत्या दरवाजांची लोकल सुरू करण्याचा एक उपाय रेल्वेने घोषित केला होता. विनावातानुकूलित लोकलगाडीला सरकते दरवाजे लावल्यास प्रवाशांची घुसमट अधिकच वाढेल, अशी समस्या काही प्रवाशांनी व्यक्त केली होती. अशी एक गाडी तयार असली, तरी ती प्रायोगिक तत्त्वावरही धावलेली नाही; तर व्यवहार्यता तपासणी तरी कशी होणार? १५ डब्यांच्या गाड्या वाढविल्यास गर्दीचा लोंढा थोडा कमी होईल, अशी शिफारस वारंवार करून झालेली आहे. मात्र रेल्वेने लक्ष दिलेले नाही. उलट सेवेतील १५ डब्यांच्या गाड्या रेल्वेला नीटपणे चालविता आलेल्या नाहीत.
या १५ डब्यांच्या गाड्यांच्या कुर्ला-ट्रॉम्बेदरम्यानची विरामासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र राज्याच्या मंत्रालयातूनच काही कळ फिरली आणि येथील झोपड्यांवरील कारवाईला खीळ लोकप्रतिनिधींनी बसली. प्रवाशांच्या जीवितरक्षणासाठी उभे राहायचे की बेकायदा बांधकामांना आश्रय देण्यासाठी, याचाही निर्णय एकदा घ्यायला हवा. कित्येक उपाय हे कमी खर्चीक व तातडीने अमलात आणण्यासारखे असतात. तेही रेल्वेला जमत नाहीत. स्थानकांपाशी रुग्णवाहिकेची व वैद्यकीय उपचारांची उपलब्धता हा त्यापैकीच एक भाग. रेल्वेने साधी उद्घोषणा योग्यरीत्या व लोकल येण्याच्या काही क्षण अगोदर केली, तरी रूळ ओलांडणाऱ्यांपैकी कित्येकांचे प्राण वाचू शकतील. रेल्वेचे अधिकारी जोपर्यंत प्रवाशांशी संवाद साधत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्यांच्या यातना कळणार नाहीत.
#ठाणे

Address

Thane
400607

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Disha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share