15/05/2026
दि.१५ मे २०२६ रोजी प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेविका सन्माननीय सौ वेदिका साहिल पाटील व सन्माननीय श्री साहिल बाळाराम पाटील ( भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष - अभियंता प्रकोष्ट) यांनी दिवा खार्डी येथील निर्मल नगरी परिसरातील रामचंद्र रेसिडेन्सी सोसायटी सदस्यांची एक बैठक घेण्यात घेतली.
*या बैठकीत नागरिकांनी थेट आपले सर्व प्रश्न मांडले पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, गटारांची अव्यवस्था, गटारांची तुटलेली झाकणे, रस्त्यावरील दिवे, रस्त्यावरील साफ सफाई, बांधकामामुळे होणारे प्रदूषण तसेच इतर ठाणे महापालिकेच्या संबंधित अडचणी मांडल्या. वेदिका ताई आणि साहिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून सूचना केल्या व पाठपुरावा करून समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन सन्माननीय नगरसेविका वेदिका पाटील व साहिल पाटील यांनी दिले.*
या बैठकीत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, सोसायटीचे पदाधिकारी, महिला वर्ग तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी मिळून चर्चा केल्यामुळे कामांना नक्कीच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करत आहोत आणि पुढेही करत राहू. लवकरात लवकर सर्व अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील आसा विश्वास त्यांनी दिला.
*या प्रसंगी निर्मल नगरी सोसायटीचे व्यवस्थापकिय समिती सदस्य योगेश झावरे-पाटील साहेब, आणि रामचंद्र रेसिडेन्सी सोसायटीचे सदस्य, महिला, माता भगिनी आणि पदाधिकारी उपस्थित होते.*
#ठाणे