News Thane

News Thane Daily News update of Thane District, and Maharashtra

28/12/2025

ठाण्यातील पाचपखाडी येथील श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री ज्ञानदेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं त्याची सांगता रविवारी दिंडी झाली. या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

28/12/2025

“बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या ठाण्यात ‘नाम भारत नमो ठाण्याचे’ बॅनर झळकणे हे दुर्दैव” – शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे

#शिवसेना

भावानिक राजकारण करून लोकांना किती दिवस फसवाल ? "नमो नव्हे, मौन" अशी खिल्ली उडवत मनसेच्या अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांन...
28/12/2025

भावानिक राजकारण करून लोकांना किती दिवस फसवाल ?

"नमो नव्हे, मौन" अशी खिल्ली उडवत मनसेच्या अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल

ठाणे,ता.२८ (प्रतिनिधी)
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला प्रथमच दोन्ही ठाकरे बंधु पुर्ण ताकदीने सामोरे जात असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. त्यामुळेच विकास कामांऐवजी आता नमो...नमो आणि प्रभु श्रीरामाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. यावर मनसेचे नेते ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, भावनिक राजकारण करून लोकांना किती दिवस फसवणार आहात ? असा रोखठोक सवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच, नमो भारत... नमो ठाणे याच्या उलट मौन भारत आणि मौन ठाणे अशी खिल्ली उडवत अविनाश जाधव यांनी, हाच शांत ठाणेकर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्या शिवाय राहणार नसल्याचे सांगितले.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी यशस्वी वाटाघाटी झाल्याचे स्पष्ट करून अविनाश जाधव यांनी, रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ठाणे पालिकेच्या निवडणुकीला दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण ताकदीने सामोरे जात असुन ठाणेकर आमच्या पाठीशी उभे राहतील, याबद्दल विश्वास व्यक्त केला. मागील निवडणुकीला आमच्या सोबत कुणी नव्हते तरी, मनसेला 45,000 मते मिळाली. त्यामुळे इथला मराठी माणूस जिवंत आहे हे विसरू नका, ठाणे शहरात जवळपास 70 टक्के मराठी लोक राहतात. हे सर्व मराठी एकत्र आले तर कुणाचीही गरज लागणार नाही. त्यातच, दोघे भाऊ जर एकत्र असतील तर काठावर असलेला मतदार देखील आमच्यासोबत येईल. असेही अविनाश जाधव म्हणाले.

भाजपच्या नमो भारत आणि नमो ठाणे बॅनरबाजी विषयी बोलताना अविनाश जाधव यांनी, सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. निवडणूका आल्या की, या गोष्टी आठवतात, इतकंच जर वाटतं तर विकासाचे बॅनर लावा. मोदींच्या नमो बॅनरने तसेच, प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात ? ठाणेकरांना धरण कसे मिळणार याचे बॅनर लावा. वाहतुकीच्या प्रश्नावर मागील वीस वर्षात काहीच काम नाही केलं, याचे देखील बॅनर लावा. ठाणे विचारत आहेत की, या नमोचा अर्थ काय ? नमो च्या उलट 'मौन' भारत, 'मौन ठाणे' म्हणजेच ठाणे शांत आहे, देश शांत आहे. त्यांना डिवचु नका, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला.

सध्या ठाणे शहरात बजबजपुरी माजली आहे. ठाण्यातील
वाहतूक प्रश्न, अपुरा पाणी पुरवठा, क्लस्टरचा प्रश्न असे 100 विषय घेऊन आम्ही या निवडणुकीत ठाणेकरांसमोर जाणार आहोत. तसेच दोन्ही ठाकरे बंधु एकाच व्यासपीठावरून जाहिर सभेला संबोधित करतील, असेही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.

28/12/2025

ठाणे महापालिका प्रभाग क्र २२ मध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना तसेच युतीला जैन समाजाचा पाठिंबा...

#शिवसेना

“ठाणे फक्त बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे” शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची पोस्ट चर्चेत...   #शिवसेना
28/12/2025

“ठाणे फक्त बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे” शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची पोस्ट चर्चेत...

#शिवसेना

28/12/2025

उषाताई विशाल वाघ यांच्या कार्य अहवाल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्सहात संपन्न.

लोकशाहीचा उत्सव जवळ आला.संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या परशुभूमीवर प्रभाग क्र. २२ मध्ये भाजप कार्यकरणी सदस्या उषाताई विशाल वाघ आणि विशाल दादा वाघ यांनी केलेल्या समाज कार्य आणि विकास कामांचा कार्य अवाहाल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विकासाच्या कान मंत्राचे पालन करून प्रभाग क्र.२२ मध्ये राबण्यात आलेल्या अनेक सामाजिक आणि लोक उपयोगी उपक्रमांचा उल्लेख या कार्य अहवालला मध्ये करण्यात आला आहे.

आमदार संजय केळकर साहेब,आमदार निरंजन डावखरे साहेब तसेच ठाणे भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले सामाजिक उपक्रम जसे कोरोना काळात केलेली माणुसकीची मदत,मतदार नोदणी,आधार कार्ड शिबिर,आरोग्य शिबिर,”मेरी माती,मेरा देश” सामाजिक आणि लोक उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्य अहवाल पुस्तकात केलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला आहे.

प्रभागात नेहमी असेच सामाजिक आणि लोक उपयोगी उपक्रम राबवत राहू तसेच सर्व सामान्य नागरिकांसाठी नेमही लढा देत राहू आणि प्रभागात विकासाचा सपाटा लावू आम्ही ही ग्वाही देतो.

या कार्य अहवाल पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस सौ.माधवीताई नाईक,जिल्हा अध्यक्ष ठाणे व पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ श्री.संजयजी वाघुले,भाजपा ठाणे शहर सरचिटणीस श्री.विक्रमजी भोईर,भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष श्री.घनश्यामजी भुयार,श्री.बाळाजी केंद्रे,भाजपा नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहितजी गोसावी,युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष समर्थजी नाईक,सूरजजी चव्हाण,मयूरदादा शिंदे,महेशदादा कदम,कृपालजी कांबळे,राजेशजी गाडे,हर्षदा जाधव,सुनील पवार,पाटील काका,राहुल जाधव,वैभव जाधव,आफताब शेख,तेजस वाघ,शुभम वाघ,गणेश लोखंडे,कपिल मारोठीया व ठाणे भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

28/12/2025

प्रभाग क्रमांक २२ मध्ये ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शाखाप्रमुख निखील बुडजडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी द्यावी.. जैन मंदिर ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी..

28/12/2025

ठाणे महापालिका प्रभाग क्र २१ मधील शिवसैनिकांची शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे

#शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Naresh Mhaske Pratap Sarnaik

28/12/2025

रेल्वे कारशेड सुविधांसाठी कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आक्रमक...

मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणारकाळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्व...
28/12/2025

मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार

काळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही

काळोखे कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सांत्वनपर भेट

खोपोली (रायगड) :-
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, रायगड जिल्ह्यात यापूर्वी कधीही राजकीय वैमनस्य एवढ्या टोकाला गेले नव्हते. मात्र मंगेश यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण घडले. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. माझे या संपूर्ण केसवर पूर्ण लक्ष आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर मोक्का सारखे गुन्हे दाखल करू, या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून आरोपींना फासावर वाढवण्यासाठी प्रयत्न करू. असे सांगितले. तसेच या प्रकरणी काळोखे कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू असेही स्पष्ट केले.

यानंतर खोपोली पोलिस स्टेशनला घेराव घालून बसलेल्या शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक करून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगितले. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. या घटनेत काळोखे कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असेही सांगितले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

27/12/2025

ठाणे महापालिका निवडणुकीत घोडबंदर रोड भागातून सिंधी समाजाला प्रतिनिधित्व द्या – वीणा भाटिया यांची ठाम मागणी

प्रामुख्याने ठाणे महापालिका प्रभाग क्र- १,२,४ व ८ मधून प्रतिनिधित्व देण्याची भाजपासह शिवसेनेकडे सिंधी समाजाची मागणी

#शिवसेना

Address

Thane

Telephone

9821705565

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Thane:

Share

Category