Palghar Live पालघर लाईव्ह

Palghar Live पालघर लाईव्ह पालघर, निसर्ग सौंदर्याची उधळण!! Palghar, the Beauty of Nature!!

*"वसई विरार हवामान परिषद संपन्न"*२५ ऑगस्ट २०२५ हवामान बदल व त्यामध्ये स्थानिकांची, शहरातील जनतेचा सहभाग यांना घेऊन  दोन ...
26/08/2025

*"वसई विरार हवामान परिषद संपन्न"*

२५ ऑगस्ट २०२५
हवामान बदल व त्यामध्ये स्थानिकांची, शहरातील जनतेचा सहभाग यांना घेऊन दोन दिवसीय "वसई-विरार हवामान परिषद २०२५" निर्मळ येथील समाज सेवा मंडळ हॉल येथे पार पडली. वसई व परिसरातील १५० हून अधिक संस्था संघटना, अभ्यासक आणि शहर प्रतिनिधींना हवामान वास्तव आणि न्याय्य हवामान कृतीच्या संवादासाठी या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आणले. जागतिक "टाउन हॉल सीओपी" पासून प्रेरित होऊन, परिषदेने वसई-विरारमधील पर्यावरणाचे प्रश्नांना लोकल ते ग्लोबल जोड देण्याबाबत चर्चा व कृती आराखड्यावर भर दिला.

हवामान परिषदेची सुरुवात "आपली वसई आपला विकास" मोहिमेचे कार्यकर्ते श्री. मॅकेन्झी डाबरे यांनी करताना "वसई विरारमधील पर्यावरण संघर्षांचा इतिहास मांडताना ग्रामीण भागातील हरित वसईची लढाई ते आता पुरात बुडणारी वसई हे वास्तव लक्षात घेता ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी पर्यावरण बदल लक्षात घेता आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने एकत्र येऊन अभ्यास वर्ग, पर्यायी नियोजन व जमिनीवरील लढाई यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले. युवा संस्थेच्या शहर नियोजनकार दुलारी परमार यांनी लिहिलेल्या "शहरी संदर्भात जागतिक ते स्थानिक हवामान बदल" या सत्रात महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे हवामान-संवेदनशील राज्य कसे आहे याची मांडणी केली. महाराष्ट्र राज्य हवामान बदल कृती आराखड्यातमध्ये (२०२०-२०३०) मुंबई आणि वसई सारख्या उपनगरीय भागांना हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका कसा आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. तर अभ्यासक दानिया डाबरे यांनी "वसई मधील हवामान धोक्याचे मॅपिंग" या सत्रात वसई-विरारमधील अलीकडील अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष सादर केले. वसई मधील जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान ४४°C च्या उच्चांकासह अति उष्णतेचे पॉकेट्स असल्याचे नमूद केले. तुंगारेश्वर राखीव वनाच्या काही भागात भूस्खलनाची उच्च संवेदनशीलता नोंदवली गेली. वसई-विरारमधील सततचे वायू प्रदूषण अधोरेखित करताना बेसुमार बांधकामे, उघडे आरएमसी प्लांट आणि वाढती धूळ यामुळे हवेची गुणवत्ता बिघडत आहे. अनियोजित जलद शहरीकरणामुळे या प्रदेशातील मौल्यवान पाणथळ जागांचे लक्षणीय ऱ्हास झाल्याचे दिसून आले. या अभ्यासात उष्णता, पूर आणि भूस्खलन जोखीम क्षेत्रे एकत्रित करण्यासाठी, वस्त्यांचे सीमांकन करण्यासाठी आणि पुनर्वसन आणि पुनर्वसनासाठी सुरक्षित जमीन वाटप करण्यासाठी हवामान आणि शहर नियोजनाची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आले.

वसई-विरारमधील हवामान बदलामुळे दैनंदिन संघर्ष कसा वाढतो याचे अनुभव विविध सामाजिक कार्यकर्ते व तज्ञ यांनी "शहरी हवामान कृती: आव्हाने आणि संधी" या विषयावर आयोजित पॅनेल चर्चेत व्यक्त केले. ज्यामध्ये महाराष्ट्र शासन हवामान कृती कक्षाच्या श्रुती पांचाळ, वास्तुविशारद आणि शहरी डिझायनर अनिरुद्ध पॉल, सामाजिक कार्यकर्ते समीर वर्तक, सचिन मर्ती, डॉमिनिका डाबरे, शशी सोनवणे, जॉन परेरा, युवाच्या कार्यकारी संचालक रोशनी नुग्गेहल्ली यांनी मांडणी केली. वसई मधील निकृष्ट रस्ते, अनियोजित बांधकामामुळे व भरावामुळे येणारे पूर, मूलभूत सेवांचा अभाव, महिला सुरक्षितता, अपुरी सार्वजनिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, कमी दर्जाच्या व पगाराच्या नोकऱ्या, अनियंत्रित बांधकामांमुळे तलाव, भूजल, नष्ट होणारे तीवराची जंगले व पाणथळ जागा याबाबत माहिती देताना चिंता व्यक्त केली. "विकास" प्रकल्पांची खरी किंमत आदिवासी, शेतकरी, कामगार, स्थानिक व शहरी जनता मोजत असल्याचे सांगितले. निसर्गाकडे असेच दुर्लक्ष केले तर पुढील पिढी नैसर्गिक जीवनापेक्षा फक्त प्रदूषित शहरे वारशाने घेईल असे असे तज्ञांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसईतील तरुणांनी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यक्रमासाठी समाज सेवा मंडळ, उत्तर वसई यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिल्याने पर्यावरण परिषद आयोजित करणे सोपे गेले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
दानिया डाबरे : 70214 27617

धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

16/04/2025

वसई तालुक्यातील काही भागांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करताना सावधान

7 ऑगस्ट 2024 रोजी सरकारच्या रेल-विभागाने एक जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यानुसार मुंबई रेल विकास महामंडळ (MRVC) व पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्तपणे डिसेंबर 2027 पासून मोठा प्रोजेक्ट प्रारंभ होणार आहे. यात बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी रेल लाईन घालण्या येणार आहे.

या रेल प्रोजेक्टसाठी वसई तालुक्यातील नवघर, माणिकपूर, दिवाणमान व आचोळे या भागांतील 122 प्रॉपर्टीचे अधिग्रहण होणार असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये नवघर अंतर्गत आनंदनगर येथील अनेक बिल्डिंगी व गाळे आहेत. कालपासून मीडियामध्ये बातम्या येत आहेत की सहा बिल्डिंगच अधिगृहीत होणार आहेत.

परंतु हे पहिले चरण असण्याची शक्यता आहे. 122 पैकी सहा जातील व बाकीच्या वाचतील असे सरकारने घोषित केलेले नाही. त्यामुळे 122 पैकी सहा जातील बाकीचे वाचतील ही चर्चा केवळ गैरसमज किंवा अफवा असण्याची दाट शक्यता आहे.

फ्लॅट किंवा गाळा घेऊ इच्छिणाऱ्यांनी याबाबत सावध रहावे. सदर क्षेत्रांतील प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास मुंबई रेल विकास महामंडळ व पश्चिम रेल्वे यांच्याकडे चौकशी व ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच प्रॉपर्टी खरेदी केल्यास फसगत होण्याची शक्यता टळेल.

मागे अशीच एक अफवा होती की फ्लॅट व गाळ्यांना सहा पट अधिक मूल्य मिळेल वगैरे हवेतील गोष्टी अफवा किंवा गैरसमज असल्याचे आता स्पष्ट झालेच आहे.

आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशी पोकळ व खोटी आश्वासने देणारे काही लोक पुढे येतील ही. पण नालासोपारातील 41 इमारतींच्या वेळी कोणी कोणाला तारले का ?त्यामुळे अशा तारक भासणार्यांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याने त्याचे ठरवावे.

त्यामुळे, वसई तालुक्यातील काही भागांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करताना सावधान राहणे योग्य ठरेल.

08/03/2025
04/03/2025

वसई ते डहाणू पर्यंतचा विकास शेषवंशी सम्राट सातकर्णीं व सोमवंशी राजा बिंबदेवाच्या दूरदर्शी धोरणांनुसार व्हावा - वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य

पालघर जिल्ह्याची भूमि ही भगवान परशुरामांनी त्रेतायुगाच्या प्रारंभकाळात निर्मिली. तसेच या क्षेत्राची नागरी, प्राकृतिक व सामरिक रक्षणाची अत्यंत कौशल्याने व्यवस्था केली. भगवान परशुराम हे निष्णात तंत्र व पर्यावरण विशेषज्ञ असल्याचे भरपूर दाखले तत्कालीन वांग्मयात सापडतात.

आता वसई ते डहाणू पर्यंत चौथी मुंबई, वाढवण बंदर वगैरे करण्याच्या महत्वाकांक्षी योजना विकासोन्मुख असलेले वर्तमान केंद्र व राज्य सरकार आखत आहे. काहींचे म्हणणे आहे कि वसई तालुक्याचा विकास जपानच्या माकुहारी शहरासारखा करायचा विचार आहे.

पण भारतीय पॉलिटिशन्स बाबत जनतेला असा अनुभव आहे कि मुंबईचे शांघाई करायला गेले ते काहीतरी भलतेच झाले. काशी चे क्योटो करायला गेले ते ही भलतेच झाले. तर वसई चे जपान करायले गेले आणि त्याचे भलतेच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वसई ते डहाणुपर्यंतचा परिसर भौगोलिक, प्राकृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या फार वैशिष्ट्यपूर्ण व संवेदनशील आहे. याचा विकास सर्वस्वी पॉलिटिशन्स व ठेकेदारांच्या भरवशावर सोपवणे अवैज्ञानिक व अदूरदर्शीपणाचे ठरेल.

वसई ते डहाणूच्या पट्ट्यात सागरी किनारपट्टी क्षेत्र, नद्यांची खोरी, वन्यक्षेत्र व पर्वतीय क्षेत्र अशी चार भौगोलिक क्षेत्रे येतात. या सर्व क्षेत्रांची रचना, आव्हाने व उपाय योजना निरनिराळ्या कराव्या लागतात. तसेच हे भौगोलिक क्षेत्रात भूगर्भीयदृष्ट्या भूकंपप्रवण व सागरीदृष्ट्या खनिज तेल देणारे आहे हे विसरून चालत नाही.

वसई ते डहाणूच्या पट्ट्यातील सागरी किनारा हा प्रवाल वनस्पती, ४० प्रकारची मत्स्यबीजे,तिवरे व जीवनावश्यक मीठ उत्पादनासाठी उपयुक्त आहे. तर सागरकिनारच्या वाड्यांचे क्षेत्र उत्तम-दर्जेदार व निर्यातक्षम प्रकारचा भाजीपाला, ताडमाड, केळी,नागवेली उत्पादक क्षेत्र आहे. तर नदीकिनारा हा रेती, विटा, उंबर-खैर जातीय वनस्पतींचे व विविक प्रकारच्या सरिसृपांचे जनन क्षेत्र आहे. या परिसरातील पर्वतीय क्षेत्रे नैसर्गिक पाण्याचे स्रोत देणारे व साग-करंज-शीसम-साल-मोह वगैरे देशी वनस्पती व वन्य जीवांची अभय स्थाने आहेत. तर वन क्षेत्रात वारली, कातकरी, कोकणा, मल्हार कोळी वगैरे अनेक अनुसूचित जनजातींची व त्यांच्या संस्कृतीची स्थाने जोपासणारी व प्रचंड प्रमाणात रानभाज्या, रानमेवा, वनौषधी,बिबटे, मोर, हरणे, रानडुकरे, फुलपाखरे वगैरे वन्य जीवांच्या निवासाची स्थाने आहेत.

वसई ते डहाणूच्या पट्ट्यचा ऐतिहासिक दृष्ट्या भगवान परशुराम, भगवान राम, हनुमान, पाच पांडव, नवनाथ योगी, आद्य जगद्गुरु शंकराचार्य व परवर्ती जगद्गुरु शंकराचार्य, बुद्ध शिष्य पूर्णा, विद्वान तेजकंठ, जैन मुनि, राजा देवानां पिसदस्सी, सम्राट विक्रमादित्य,शेषवंशी सम्राट सातवाहन, सोमवंशी राजा बिंबदेव, छत्रपती शिवराय, छत्रपतींनी नियुक्त केलेले श्रीमंत पेशवे असा मोठा वारसा लाभला आहे.

वसई ते डहाणूच्या पट्ट्याच्या निर्मितीसोबतच वैदिक धर्मिय होते, २८०० वर्षांपासून जैनांचा सुप्पारक गच्छीय साधक आले, २५०० वर्षांपूर्वी बौद्धधम्मी आले, १००० वर्षांपूर्वी यहुदी व पारशी आले, ९०० वर्षांपूर्वी गुजरातेतून व मुंगी पैठणहून सोमवंशी व शेषवंशी क्षत्रिय तसेच आगरी आले. ५३० वर्षांपूर्वी मस्कत व गुजरातेतून मुस्लिम आले, ४८० वर्षांपूर्वी काही ख्रिस्ती झाले. पण या सर्व धर्म व जाती जमातींचे गुण्यागोविंदाने सहजीवन हे येथील धार्मिक वैशिष्ट्य आहे. तो अनुबंध विकासाच्या तडाख्यात येऊ नये.

वसई ते डहाणूच्या पट्टा सांस्कृतिक दृष्ट्या नागरी, ग्रामीण व जनजातीय संस्कृतींचे स्वतंत्र व सीमा क्षेत्र आहे. चौथी मुंबई बनवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी यातील एकही संस्कृतीचा नाश होणे वा धोक्यात येणे मानवता व भारतीय परंपरांसाठी धोक्याचे ठरेल.

वसई ते डहाणुचा विकास पूर्वीही अनेकदा झाल्याचे दाखले सापडतात. पहिला विकास भगवान परशुरामांनी केला, दुसरा ज्ञात विकास धर्मराज युधिष्ठिराने केला, तिसरा विकास सम्राट विक्रमादित्य यांनी केला, चौथा विकास देवानांपिय पियदस्सी राजाने केला, पाचवा विकास सम्राट सातवाहनाने केला, सहावा विकास राजा बिंबदेवाने केला, सातवा विनाशक विकास पोर्तुगीजांनी केला, आठवा विकास छत्रपती शाहू प्रथम यांच्या पेशव्यांनी केला, नववा विकास पोस्ट-रेल्वे आणणार्या इंग्रजांनी केला, दहावा विकास वर्तक-ठाकुर या पॉलिटिशन्स ने शाळा-कॉलेज-बिल्डींगी बांधून केला. या सर्व दहा बदलांपुढे येत्या वर्तमान काळात शेषवंशी सम्राट सातवाहन व सोमवंशी राजा बिंबदेव यांच्या दूरदृष्टीच्या आधारे आताचा अकरावा विकास केल्यास वसई ते डहाणूचे भौगोलिक, प्राकृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आयाम सुरक्षित राहतील.

तेव्हा, वसई ते डहाणू पर्यंतच्या विकासाची धुरा केवळ पॉलिटीशन्स व ठेकेदारांच्या हाती न सोपवता वरील आयामाचे जागतिक तज्ञांचे सहाय्य व आमच्यासारख्यांच्या सदीच्छा व मार्गदर्शन घेऊन करणे गरजेचे आहे.मुळात या अकराव्या विकासाची दिशा जपान प्रमाणे नाही किंवा पहिल्या ते तिसर्या मुंबई प्रमाणे नाही तर शेषवंशी सम्राट सातवाहन व सोमवंशी राजा बिंबदेवाच्या दूरदर्शी धोरणांनुसार ठरवणे सर्वहितप्रद ठरेल. असे प्रतिपादन धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी जनतेशी संवाद साधताना केले.

20/01/2025
अनपेक्षित अपेक्षित.वसईविरारच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय पटलावर बऱ्याच काळापासून चर्चेत असलेले राजेंद्र ढगे ह्यांनी २५ ...
26/10/2024

अनपेक्षित अपेक्षित.

वसईविरारच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय पटलावर बऱ्याच काळापासून चर्चेत असलेले राजेंद्र ढगे ह्यांनी २५ ऑक्टोबर रोजी १३३ वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
सामाजिक कार्यासाठी गेले अनेक वर्षे प्रामुख्याने वसईविरार, तसेच मुंबई ठाणे मध्ये सक्रिय असलेले राजेंद्र ढगे महाराष्ट्रात आरोग्यविषयक जनजागृती कार्यासाठी ओळखले जातात. वसईविरारच्या जनतेला आरोग्य सेवांचा योग्य लाभ मिळण्यासाठी राजेंद्र ढगे ह्यांनी अथक प्रयत्न केले आहेत, सोबत शासनाच्या आरोग्य योजनांचा यशस्वी पाठपुरावा केला आहे.
कोविड काळात राजेंद्र ढगे २४ तास उपलब्ध राहिले. त्यानंतरही विनामूल्य मार्गदर्शन करत समाजसेवा सुरुच ठेवली. वीज पाणी स्वच्छता शिक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर देखील राजेंद्र ह्यांनी सातत्याने काम केले आहे. निरपेक्ष आणि निस्वार्थी सेवेसाठी सामाजिक व आरोग्यविषयक पुरस्कारांनी राजेंद्र ढगे ह्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र ह्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु होती, सोशलमिडीयावर अनेकांनी राजेंद्र ढगेंच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. आपली उमेदवारी हि कोणाच्याही विरोधात नसून जनतेच्या सेवेची हि अमूल्य संधी आहे असे स्पष्ट करुन अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज केला. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार अशी विचारणा होत असतानाच अपक्ष उमेदवारी जाहीर करुन राजेंद्र ह्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याचबरोबर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांशी असलेल्या लढतीमूळे आता नव्या चर्चेचा आरंभ झाला आहे.

Address

Vasai Road
Vasai
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Live पालघर लाईव्ह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share